शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

वक्फ बोर्डाची जमीन अदानी, अंबानीला देण्याचा भाजपचा डाव; अंबादास दानवेंचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: April 3, 2025 19:46 IST

'शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, मात्र अर्थमंत्री अजित पवार स्पष्टपणे कर्जमाफी नाकारत आहेत.

छत्रपती संभाजी नगर: वक्फ बोर्डाची जमीन अदानी आणि अंबानीला देण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. केंद्र सरकारने बुधवारी रात्री उशिरा वक्फ दुरूस्ती विधेयकला मंजुरी दिल्यासंबंधी विचारल्यावर आ.दानवे यांनी उपरोक्त उत्तर दिले. 

छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या आ.दानवे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. आज मात्र उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीतदादा पवार हे स्पष्टपणे कर्जमाफी नाकरत आहे, ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.

बीड मध्ये गुंडगिरी खपवून घेणार नाही,असे उपमुख्यमंत्री अजीतदादा यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, बीड मध्ये गुन्हेगारी का वाढली आहे. गुन्हेगारांना सरंक्षण देणारे तेथील राजकारणी लोकं आहे. बीड मध्येच गुन्हेगारी का वाढली यांची दखल पंकजा मुंडे यांनी घेतली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

चंद्रकांत खैरे ज्येष्ठ आहेतशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपाविषयी विचारले असता आ.दानवे म्हणाले की,खैरे साहेब ज्येष्ठ आहेत. अशात कोणता कार्यक्रम आपण घेतला नाही.आठवडा, पंधरा दिवसाला त्यांच्याकडे जात असतो, असे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट पर्यंत आपण विरोधी पक्षनेतेपदी असलो तरीही शिवसेना नेतेपदी पुढेही असेल.यामुळे आपल्याला  थांबू शकत नसल्याचे नमूद केले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेwaqf board amendment billवक्फ बोर्ड