शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मराठवाड्यात आता ‘वंचित’वर भाजपची भिस्त ! अपेक्षित ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच

By नंदकिशोर पाटील | Updated: April 20, 2024 16:44 IST

भाजपाची मराठवाड्यात पुन्हा चौकार मारण्याची तयारी

छत्रपती संभाजीनगर: गेली दोन-अडीच वर्षांपासून मराठवाड्यात भाजपची मतपेरणी सुरू होती. लातूर, नांदेड, जालना आणि बीड या विद्यमान जागांसह उस्मानाबाद, औरंगाबाद आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. उमेदवारही जवळपास निश्चित होते. मात्र, राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विरोधी पक्षातील दोन नेते त्यांच्या पक्षासह सोबत आल्याने भाजपच्या सगळ्या तयारीवर पाणी पडले. भाजपसह शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांची महायुती झाली आणि ठरविलेल्या जागा मित्रपक्षाकडे गेल्या. म्हणजे असं की, मशागत करून तयार ठेवलेलं रान ऐन पेरणीच्या वक्ताला धाकट्या भावाच्या वाटणीला गेलं! उमेदवार ठरविण्यापासून केलेली सगळी मेहनत वाया तर गेलीच, शिवाय या वाटणीवरून घरातील भांड्यांची आदळआपट झाली ती वेगळीच! 

औरंगाबाद मतदारसंघात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे गेली दोन वर्षांपासून तयारी करत होते. मात्र, ही जागा शिंदेसेनेला गेली. उस्मानाबादमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर भाजपमध्ये घेण्यात आले. पण, ही जागा ऐनवेळी अजित पवारांकडे गेली. हिंगोलीत रामदास पाटील यांनी तर क्लास वन अधिकारी पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढण्याची तयारी केली होती. मात्र, ही जागाही शिंदेसेनेकडे गेली! या जागावाटपावर पक्षात नाराजी दिसून येते. शिवाय, जरांगे फॅक्टर हाही भाजपसाठी चिंतेचा विषय आहे.

मराठवाड्यात भाजपने चार जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पैकी रावसाहेब दानवे (जालना), प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड) आणि सुधाकर श्रृंगारे (लातूर) या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, बीडमध्ये दोन टर्म खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांना घरी बसवून त्यांच्या जागी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मैदानात उतरविले आहे. भाजपकडे सध्या विद्यमान चार खासदारांसह अशोकराव चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे हे दोन राज्यसभा सदस्य, सोळा आमदार आणि दोन विधान परिषद सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. स्व. प्रमोद महाजन आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाड्यात भाजप अतिशय निगुतीने रुजविला. परंतु, भाजपला शिवसेनेसोबतच्या युतीचा अधिक फायदा झाला. १९९५ च्या विधानसभेत युतीचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले. त्यापूर्वी पुंडलिक दानवे (जालना) यांनी १९८९ साली पहिल्यांदा भाजपचे खाते उघडले. दानवे यांच्यानंतर उत्तमसिंह पवार, जालना (१९९६), जयसिंगराव गायकवाड, बीड (१९९८), श्रीमती रूपाताई निलंगेकर, लातूर (२००४) अशा प्रकारे लोकसभेच्या एखाद्या जागेवर भाजप विजयी होत असे. मात्र, २०१९ च्या मोदी लाटेत भाजपने थेट चौकार मारला! वर उल्लेख केलेल्या चारही जागा जिंकल्या. यावेळीही ते पुन्हा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. पण, यावेळी विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

‘वंचित’वर दारोमदार !२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे नांदेड, लातूर, हिंगोली या तीन जागांवरील काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. नांदेडमधून यशपाल भिंगे यांनी सुमारे १ लाख ६६ हजार, लातूरमध्ये राम गिरकर यांनी १ लाख १२ हजार, हिंगोलीत मोहन राठोड यांनी १ लाख ७४ हजार मते घेतली होती. यावेळीही ‘वंचित’वर भाजपची भिस्त आहे. मात्र, वंचितने मागील निवडणुकीत भरघोस मते घेतलेल्या उमेदवारांना डावलून यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने भाजपला अपेक्षित असलेले ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४BJPभाजपाnanded-pcनांदेड