शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मराठी भाषेची जननी मराठवाडाच; अजिंठ्याच्या डोंगररांगा, गोदावरी खोऱ्यातील जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 5:19 PM

यादवांच्या काळात पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुसऱ्यांदा मराठी ही राजभाषा झाली

औरंगाबाद :मराठी भाषेचा जन्म हा अजिंठ्याच्या डोंगररांगा व गोदावरी खोऱ्यातील भूभाग अर्थात मराठवाड्यात झाला. आजच्या प्रमाण मराठी भाषेतील रूपे ही मराठवाड्याच्या मराठी भाषेतील आद्यरूपे आहेत, असे प्रतिपादन मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. तर औरंगाबाद जिल्ह्यातील साहित्य परंपरेतील संत बहिणाबाई, निळोबाराय, शाहीर विश्राम पाटील यांच्यावर संशोधनाची गरजही त्यांनी व्यक्त केली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभाग व भाषा संचालनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित जागर मराठीचा या कार्यक्रमात बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्याची साहित्य व सांस्कृतिक परंपरा या विषयावर उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. मंचावर विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य, भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाचे बाबासाहेब जगताप, कवी हबीब भंडारे व समन्वयक डॉ. कैलास अंभुरे उपस्थित होते.

ठाले पाटील म्हणाले, शालिवाहन काळापासून पैठण हे सर्व सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र होते. बौद्ध धर्माच्या चार केंद्रांपैकी अजिंठा हे एक केंद्र होते. यादवांच्या काळात पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुसऱ्यांदा मराठी ही राजभाषा झाली; परंतु हेमाद्री पंडिताने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथाद्वारे कर्मकांडाचे स्तोम वाढवले. मराठवाड्यातील ब्राह्मण उदार होते म्हणून ते चळवळीत आले. परिणामी मराठवाड्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ निर्माण झाली नाही.

गावात अन् नावात काय असते, ही भावना चुकीचीप्रास्ताविकात विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य यांनी स्वतःचे नाव, गाव यांनाही एक सांस्कृतिक परंपरा असते. ती स्व जाणीव ओळखण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराबद्दल कवी हबीब भंडारे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. विलास गायकवाड यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. डाॅ. सुधाकर शेंडगे, प्रिया धारुरकर, प्रा. रामेश्वर वाकणकर यांच्यासह विद्यार्थी, संशोधकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarathiमराठी