शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

हायड्रोजनपासून ऊर्जा निर्मितीचे उपकरण तयार; कोळसा, पवन, सौर ऊर्जेपेक्षा पडेल स्वस्त

By संतोष हिरेमठ | Updated: November 24, 2023 13:38 IST

शास्त्रज्ञ पद्मश्री प्रल्हादा रामाराव : १० वर्षांत ५०० वेळा प्रयोग, प्रकल्पाला निधीची प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल, गॅस, कोळसा यांसारख्या ऊर्जा निर्मिती करणाऱ्या स्रोतांसाठी आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. पवन ऊर्जा प्रभावी नाही. तर, सौर ऊर्जा फक्त दिवसाच्या वेळा उपयोगात आणता येते. शिवाय हिवाळा-पावसाळ्यात मर्यादा असतात. या सर्वांवर प्रभावी पर्याय हवा, या विचारातून हायड्रोजनपासून ऊर्जानिर्मिती करणारे उपकरण तयार केले. मात्र, निधीअभावी हा प्रकल्प प्रभावीपणे पुढे आणता येत नसल्याचे भारतीय क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ, संरक्षण संस्थेच्या प्रगत तंत्रज्ञानाचे माजी कुलगुरू आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे माजी संचालक पद्मश्री प्रल्हादा रामाराव यांनी सांगितले.

ऊर्जेवरील परावलंबित्व संपवणाऱ्या या उपकरणाची माहिती देण्यासाठी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत रामाराव बोलत होते. ते म्हणाले, मी २७ वर्षे भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. अनेक संशोधन मोहिमांत सोबत काम केले. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे, आपण अनेक संशोधने देश आणि सैन्यासाठी केली. पण, सामाजिक ऋण म्हणून सर्वसामान्यांसाठीही संशोधन केले पाहिजे. हीच प्रेरणा घेऊन मी १० वर्षांपूर्वी संशोधनाला सुरुवात केली.

ऊर्जेकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. फ्रान्स, चीन, अमेरिका सर्वत्र याविषयी संशोधन सुरू आहे. भारतात या सर्व ऊर्जा स्रोतांची मागणी दरवर्षी २५ ते ३० टक्के वाढत आहे. त्यामुळे आपण याविषयी अधिक तीव्रतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. २००८ मध्ये सुरू केलेले संशोधन २०१८ मध्ये आम्ही पूर्ण केले. त्याला कमिटीपुढे सादर केले. संशोधन अचूक असल्याचे सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऊर्जा मंत्रालयाचे पदाधिकारी, अधिकारी सर्वांपुढे हे संशोधन मांडले आहे, असे प्रल्हादा रामाराव यांनी सांगितले.

घरातील प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जा निर्मितीहायड्रोजनच्या वापराने हे उपकरण घरातील प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जा निर्मिती करू शकेल. अत्यंत लहानशा उपकरणाने अनेक परिमाणे बदलतील. सरकारच्या मर्यादा आहेत. पण, औद्योगिक क्षेत्रातील जाणकार पुढे आल्यास प्रकल्प लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी धडपड सुरू आहे. हे संशोधन पूर्ण क्षमतेने जगापुढे आणण्यासाठी किमान १५ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे, असे प्रल्हादा रामाराव म्हणाले.

टॅग्स :electricityवीजFuel Hikeइंधन दरवाढAurangabadऔरंगाबादscienceविज्ञान