शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

गुरेढोरे, शेतजमिनीसह गोरेगाव तालुका विक्रीला; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला

By विजय पाटील | Updated: January 8, 2024 13:56 IST

शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीची भरपाई अथवा पिक विमा मिळाला नाही.

हिंगोली: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटत असून दुष्काळी मदत नाही, पिक विमा नाही, अशा परिस्थितीत कर्ज फेडता येत नाही  त्यामुळे गोरेगाव अप्पर तहसील क्षेत्रातील गुराढोरांसह शेतजमिनी विकत घ्याव्या, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी अप्पर तालुका विक्रीला काढला आहे.

गोरेगाव अप्पर तहसीलमध्ये गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे  या निवेदनात म्हटले की, यंदाच्या खरीप हंगामात आधी पाऊस न पडल्यामुळे तर नंतर अतिवृष्टीने नुकसान झाले. पुन्हा पिके ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिली. त्यामुळे सोयाबीनवर येलो मोजक रोग पडला. त्यानंतर कापसावर लाल्या रोग पडला. तर तुरीलाही गडद धुक्याने ग्रासले.

या भागातील प्रमुख पिकेच वाया गेली. पीक आणेवारी 50 टक्केच्या आत आहे. तरीही शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीची भरपाई अथवा पिक विमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत शासन त्याचा गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे एक तर कर्जमाफी द्या अन्यथा गुराढोरांसह शेतजमिनी विकत घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र