शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 1:12 PM

मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने दहा उच्च पदस्थ अधिकारी सदस्यांचे केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौऱ्यावर येत आहे

ठळक मुद्दे५ ते ७ डिसेंबर या कालावधीत दौराविदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तीन पथके

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने दहा उच्च पदस्थ अधिकारी सदस्यांचे केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौऱ्यावर येत असून, तीन पथके राज्याचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाऱ्या पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छवी झा या असतील. खरीप हंगाम २०१८ मध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पिकांची उत्पादकता घटली आहे. त्या अनुषंगाने शासनाने केंद्र शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. 

राज्य शासनाच्या मागणीचा ग्राऊंड रिपोर्ट घेण्यासाठी पथक औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, बुलडाणा जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेईल. ५ रोजी सकाळी ९ वाजेपासून तिन्ही पथके येथून रवाना होतील. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी मुंबई येथील बैठकीत राज्यातील खरीप पाहणीचा अहवाल देतील. त्या अहवालानंतर केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी मदतीबाबत निर्णय घेतील. पथकात नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी विमानाने औरंगाबादेत येतील. ५ रोजी सकाळी ९ ते १०.३० दरम्यान विभागीय प्रशासन आयएमसीटीला येथील दुष्काळी परिस्थितीबाबत अवगत करतील. त्यानंतर तिन्ही पथके नेमून दिलेल्या जिल्ह्यांकडे प्रस्थान करतील. 

पथक क्र.१या पथकात सहसचिव छवी झा, भोपाळ येथील संचालक ए.के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश असेल. हे पथक ५ रोजी औरंगाबाद आणि जालना येथे पाहणी करील. त्यानंतर जालना येथे मुक्कामी थांबेल. ६ रोजी परभणी आणि बीड जिल्ह्यांतील पाहणी करून औरंगाबादेत मुक्कामी असेल. ७ रोजी सकाळी विमानाने मुंबईतील बैठकीला पथकातील सदस्य जातील. 

पथक क्र. २या पथकात एफसीडीचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, मुंबईचे एफसीआयचे डीजीएम एम.जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांचा समावेश असेल. हे पथक ५ रोजी अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांत जाईल. सोलापूर येथे मुक्कामी थांबेल. त्यानंतर ६ रोजी सांगली, सातारा आणि पुण्यातील खरीप क्षेत्राची पाहणी करून पुण्यात मुक्कामी थांबतील. ७ रोजी मुंबईतील बैठकीला हे पथक जाईल. 

पथक क्र. ३या पथकात सहसल्लागार महेश चौधरी आणि एस.सी. शर्मा यांचा समावेश असेल. ५ रोजी हे पथक बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यांत जाईल. पथकाचा जळगावात मुक्काम होईल. त्यानंतर ६ रोजी धुळे व नाशिक जिल्ह्यांतील परिस्थितीचा पथक आढावा घेऊन नाशिकला मुक्कामी थांबेल. ७ रोजी पथक मुंबईतील बैठकीला हजेरी लावील.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेती