शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
2
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
3
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
4
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
5
IND vs BAN: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
6
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
7
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
8
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
9
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
10
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
11
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
12
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
13
खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
14
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
15
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
16
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
17
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
18
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
19
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
20
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!

"छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात...", चंद्रकांत खैरेंचे वादग्रस्त वक्तव्य

By बापू सोळुंके | Published: September 01, 2024 4:48 PM

शिवसेना(उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. रविवारी(दि.01) राज्यभर 'जोडे मोरो' आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना(उबाठा) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात दंगली झाल्या पाहिजेत, असे अशी मुक्ताफळे उधळल्याने खळबळ उडाली आहे. 

मालवण येथील पुतळा पडल्यापासून महाविकास आघाडी सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार ) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सरकारविरोधात राज्यभर तीव्र निदर्शने करत आहेत. दरम्यान, आज मविआने राज्यात राज्य सरकारला जोडे मारो आंदाेलन छेडले होते. रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले.

खैरे नेमकं काय म्हणाले?याच पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना राज्यात दंगली झाल्या पाहिजे अशी मुक्ताफळे उधळली. एवढेच नव्हे तर राज्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कोणी विटंबना केली तर दंगली होतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतरही दंगली का होत नाही? दंगली झाल्या पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारविरोधात आंदोलन

रविवारी शहरातील क्रांती चौकात सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या मुख्यमंत्रीआणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची छायाचित्र असलेली बॅनर पोलिसांनी आंदोलकांशी झटापट करून हिसकावून घेतले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून क्रांतीचौक परिसर दणाणून सोडला.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना