शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
2
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
3
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
4
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
5
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
6
7 तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात! अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती
7
भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या
8
टीव्ही-फ्रिज सगळ्यामध्येच होताहेत स्फोट, लेबेनॉनमधील रहिवासी दहशतीच्या छायेखाली
9
कोट्यवधींचं घबाड! रिटायर्ड IAS अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले २० कोटींचे हिरे, सोनं, कॅश
10
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
11
Ion Exchange Share Price: 'या' कंपनीला Adani Power कडून मिळालं ₹१६१ कोटी रुपयांचं कंत्राट; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
12
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
13
IND vs BAN : गिलच्या पदरी भोपळा! Hasan Mahmud नं किंग कोहलीसमोरही फिरवली जादूची कांडी
14
एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका
15
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
16
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
17
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
18
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
19
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
20
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी

फडणवीस विचारत होते, तुमचे इकडे काय काम, तेलंगानाच सांभाळा; केसीआरनी उपमुख्यमंत्र्यांना ललकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 9:03 PM

तलाठी किती पावरफुल आहेत महाराष्ट्राचे. मुख्यमंत्र्यांपेक्षा आहेत. हे ब्रम्हदेव आहेत, केसीआर यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाणी, वीज प्रश्नावर तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आजच्या सभेतून आवाज उठविला. केसीआर यांनी नागपूर, विदर्भात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यावर फडणवीसांनी त्यांनी तुम्ही महाराष्ट्रात का येताय, तेलंगानाच सांभाळा, असे विचारल्याचे केसीआर म्हणाले. यावर केसीआर यांनी मी महाराष्ट्रातून निघून जाईन, पण या दोन गोष्टी करा, मगच, असे आव्हान दिले आहे. 

Chandrashekhar Rao Live: महाराष्ट्रात पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार; केसीआर यांचे मोठे आश्वासन

केसीआर यांची आज छत्रपती संभाजी नगरमध्ये सभा झाली. यामध्ये त्यांनी तलाठ्यांनाही लक्ष्य केले. तेलंगानात आम्ही तलाठी व्यवस्थाच संपवून टाकली आहे. मोदी सांगतात डिजिटलाझेशन करा, मग शेतकऱ्यांचे का केले जात नाहीय. आम्ही केलेय. तलाठी किती पावरफुल आहेत महाराष्ट्राचे. मुख्यमंत्र्यांपेक्षा आहेत. हे ब्रम्हदेव आहेत. ज्याच्या नशीबात हवे त्याला ते जमिन लिहून देतात. यामुळे आम्ही तेलंगानात तलाठी व्यवस्थाच बंद केली. शेकऱ्यांना एकरी १० हजार देतो, ते अधिकाऱ्यांमार्फत नाही. थेट देतो. शेतकऱ्यांचा विमा मृत्यू झाल्याच्या आठ दिवसांच्या आत घरी जाऊन पाच लाख रुपये दिले जातात. शेतकऱ्यांचे धान्य आम्ही तिथे जाऊन खरेदी करतो. त्याचा पैसाही थेट खात्यात जातो. कोणी दलाल नाही, असे केसीआर म्हणाले. 

शेतकऱ्यांनो येती जिल्हा परिषद निवडणूक तुमच्या हातात आहे. एकदा गुलाबी झेंडा फडकवा तुमच्या मागे काय काय नाही येत ते बघा. उपमुख्यमंत्री फडणवीस मला सांगत होते की तुमचे इकडे काय काम आहे. तुम्ही तेलंगानाच सांभाळा. मी त्यांना म्हणालो मी तेलंगाना सांभाळले, आता महाराष्ट्रात आलोय. देशात कुठेही जाऊ शकतो. शेतकऱ्यांना तेलंगाना जे देतेय ते द्या मी मध्य प्रदेशला जातो. करा तुम्हीच राज्य. महाराष्ट्रात पैशांची कमी नाहीय, मनाची कमी आहे, असे आव्हान केसीआर यांनी दिले.यानंतर मी तेलंगानात दलित बंधू मोहीम सुरु केलीय. फडणवीसांना मी सांगतो तुम्हीही दलित बंधू योजना सुरु करा. मी महाराष्ट्रातून निघून जातो, असे केसीआर म्हणाले.  

पाण्यावर काय बोलले...बीआरएस पक्षाने नागपूरमध्ये कायमस्वरुपी कार्यालय उघडले आहे. इथेही भाड्याने नाही तर कायमचे कार्यालय स्थापन करणार आहोत. इथे पाणी नाहीय, अकोल्यात नाहीय. पुण्यातून वकील आले ते म्हणाले तिथेही काही ठीक नाहीय. काय चाललेय इथे. पाणी आणि वीज या दोन गोष्टी सर्वांनाच लागतात. नेहरुंच्या काळात काहीतरी योजना बनत होत्या, आता नालायक पक्षांमुळे देश सहन करत आहे. देशात पाणी वापरात आले पाहिजे तर चांगले बंधारे बांधले गेले पाहिजेत. झिम्बाब्बेमध्ये पाणी साठवले जाते. तिथल्यासारखे देशात तीन चार धरणे असायला हवीत. परंतू केले जात नाहीय. नवीन रचना, नवीन कायदे आणले नाहीत तर हे होणार नाहीत. पाण्याला समजण्यासाठी आपला देशा आजही मागे आहे. माणूस पाण्याला बनवू शकत नाही, असे केसीआर म्हणाले.  

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस