शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

छत्रपती संभाजीनगरची जागा 'वंचित'चीच; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनेने आघाडीत खळबळ

By स. सो. खंडाळकर | Updated: March 15, 2024 11:28 IST

महाविकास आघाडीतील १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट पाहतोय. नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभेची जागा ही वंचित बहुजन आघाडीची असून ती आम्ही जिंकलेली असल्याने आम्ही सोडणार नसल्याचे जाहीर करून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त घोषणा केली परंतु उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले.

ॲड. आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट पाहतोय. नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे. यावेळी आपण अकोल्यातून एकाच ठिकाणाहून लढणार आहोत. अमरावतीहून सुजात आंबेडकर यांनी लढावे असा जनतेचा आग्रह आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत हे नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत? उबाठाचे, शरद पवारांचे की काँग्रेसचे असा सवाल उपस्थित करीत त्यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला.

यावेळी डॉ. धैर्यवान पुंडकर,सिद्धार्थ मोकळे, प्रभाकर बकले, योगेश बन, ॲड. लता बामणे, महेश निनाळे, पंडितराव तुपे, रवी तायडे, सय्यद जफर आदींची उपस्थिती होती.

मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा,संपवण्याचा प्रयत्न होईलमनोज जरांगेंना संपवण्याचा प्रयत्न होईल. त्यांना बदनाम केले जाईल. नजीकच्या काळात मॉर्फिंग करून त्यांना अश्लील स्वरूपात दाखवण्यात येईल, त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये, असे खळबळजनक आवाहन ॲड. आंबेडकरांनी केले. ते म्हणाले, मनोज जरांगे यांचे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाला काबूत घेता आले नाही. नाना तऱ्हेने ते दाबण्याचा प्रयत्न होत आहे. माझी अधिकृत माहिती आहे की, जरांगे पाटील यांचा व्हिडीओ तयार करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यांच्या समर्थकांना विचलित करण्याचा यातून प्रयत्न होणार आहे. हे अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले जाणार आहे. मी हा व्हिडीओ पाहिला नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्वत: जरांगे पाटील यांनीही याबद्दलची दक्षता घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. आंबेडकर पुढे म्हणाले, अशा बदनामीपासून वाचण्यासाठी आता जरांगेंनी राजकीय प्रवास सुरू केला पाहिजे. जे आरक्षण मिळाले आहे, ते टिकवण्याची पहिली जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्याच समाजातून विरोध करणाऱ्यांनाही हेच उत्तर राहील. जरांगेंमुळे प्रस्थापित मराठ्यांना धक्का बसू शकतो. अधिक उमेदवार करण्यामुळे ईव्हीएम बाद होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी