शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

असेही गाव, जेथे १०० वर्षांत ना कोणी घरासमोर मंडप उभारला ना लग्न लावले; रंजक आहे कारण

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 20, 2023 15:38 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या गावात ‘नो बॅंड बाजा बराती’

छत्रपती संभाजीनगर : सर्वत्र लग्नसराईची धुमधाम सुरू आहे. गावागावातही भले मोठे मंडप टाकून धुमधडाक्यात लग्न पार पडत आहे. मात्र, पैठण तालुक्यातील ‘हिवरा चौंढाळा’ या गावात मात्र, मागील १०० वर्षांत कोणी घरासमोर मंडप उभारलेला किंवा लग्न लावलेले नाही. याचा अर्थ या गावात सर्व अविवाहित आहेत असे नाही. गावाच्या वेशीबाहेर जाऊन हनुमान मंदिराच्या साक्षीने लग्न लावले जातात. पण गावात कोणी लग्न लावण्याचे धाडस करीत नाही.

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल... मात्र, हे तेवढेच सत्य आहे. छत्रपती संभाजीनगर शहराकडून ‘बीड’ कडे जाताना ७० कि.मी अंतरावर ‘हिवरा चोंढाळा’ हे गाव आहे. या गावात श्रीक्षेत्र माहूरच्यादेवीचे उपपीठ आहे. येथे दगडी चिरेबंदी वाडा असून मंदिरही संपूर्ण दगडात बनविले आहे. गाभाऱ्यात चार बाय चार फुटांचा देवीचा तांदळा (मुखवटा) आहे. पाषाणातील हा तांदळा शेंदूर रंगाचा व देवीचे डोळे मोठ्या आकारातील आहे. ही देवी अविवाहित आहे. यामुळे तिचा आदर करण्यासाठी किंवा तिचा कोप होऊ नये यासाठी गावकरी गावात लग्न लावत नाही, घरासमोर मंडप उभारत नाही. गावाच्या दीड ते दोन कि.मी. वेशीबाहेर लग्न लावतात. हे मंदिर सुमारे ५०० पेक्षा अधिक वर्षांचे आहे, असे येथील गावकऱ्यांनी सांगितले. पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली जात आहे.

बाळंतीणसुद्धा झोपते जमिनीवरहिवरा चोंढाळातील देवीच्या मंदिरापेक्षा घराची उंची जास्त असू नये, यासाठी गावातील श्रीमंत असो वा गरीब कोणीही घरावर पहिला मजला बांधत नाही. सर्वजण तळमजल्यावरच राहतात. तसेच देवीची कोणी बरोबरी करू नये यासाठी सर्व जण जमिनीवर झोपतात. पलंगाचा वापर कोणी करीत नाही. बाळांतीणसुद्धा जमिनीवरच झोपते. आजपर्यंत मी कोणाला गावात लग्न लावताना पाहिले नाही.- सत्यभामा करताडे, गावातील १०० वर्ष वयाच्या आजी

लग्न लावल्यावरच नवरदेव गावात पाऊल ठेवतोगावातील तरुणीचे बाहेर गावातील तरुणाशी लग्न जुळले. तर लग्नाच्या दिवशी नवरदेव हिवरा चोंढाळा गावात पाऊल ठेवत नाही. थेट वेशीबाहेरील मंगल कार्यालयात वरात जाते. लग्न लागल्यानंतर नवरा-नवरी जोडीने गावात येतात व देवीचे दर्शन घेतात.

गावकऱ्यांची श्रद्धादेवीला लग्न करायचे नव्हते, पण दैत्यराजाने बळजबरीने लग्नाचा प्रयत्न केला. त्यावेळीस देवीचा कोप झाला व दैत्यराजाने आणलेले वऱ्हाडी दगडात रूपांतर झाले म्हणून गावाच्या आसपास लहान-मोठे असंख्य दगड दिसतात, अशी कथा पूर्वजांनी सांगितली. यामुळे कोणी गावात लग्न लावत नाही. वेशीबाहेर लग्न करतात. गावात आज ७०० लोकसंख्या आहे. देवीचे मंदिर पुरातन आहे.- कमलाकर वानोळे, पूजाअर्चा, देखभाल करणाऱ्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिकmarriageलग्न