शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

तीव्र पाणीटंचाईने चिकू बागा धोक्यात; उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 5:16 PM

चिकू फळबागा अडकल्या पाणीटंचाईच्या चक्रव्यूहात; एप्रिल, मेमध्ये गरज असताना पाण्याचा तुटवडा

वासडी ( छत्रपती संभाजीनगर) : परिसरातील अनेक गावांमध्ये चिकूच्या फळबागा आहेत. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने या बागा धोक्यात आल्या आहेत. बागांना बहार लागण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक पाण्याची आवश्यकता लागते. मात्र यंदा वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याने चिकूच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे फळबागधारक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कन्नड तालुक्यातील वासडी परिसरातील साखरवेल, खातखेडा, रामनगर, पळशी बु., पळशी खु, पिशोर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिकूच्या बागा आहेत. यातील अनेक फळबागा या तीस वर्षांपूर्वीच्या आहेत. या फळबागांना एप्रिल मे मध्ये पाण्याची व्यवस्था असली, तर उत्पादनात चांगली वाढ होते. मात्र यंदा परिसरातील अंजना-पळशी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे. तसेच कडक उन्हाळ्यामुळे विहिरींमधीलही पाणी आटले आहे. परिणामी शेतकऱ्यांना ऐन बहरात या फळबागांना पाणी देता आले नाही, याचा विपरीत परिणाम मृग बहार धरण्यावर, तो टिकण्यावर आणि पर्यायाने उत्पादनात सर्वाधिक फटका बसणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या आंबा बहरावरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता जूनमध्ये जरी पाणीटंचाई दूर झाली तरी, बागांचे नुकसान भरून निघणार नाही, अशी माहिती खातखेडा येथील शेतकरी नारायण मोहनराव पवार, रामनगर येथील शेतकरी संजय कौतिकराव गायकवाड यांनी दिली.

पाणीटंचाईमुळे ठिबकचा वापरवासडी परिसरातील जवळपास शेतकरी चिकूच्या बागांना यापूर्वी आळे पद्धतीने पाणी देत होते. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी उधार उसणे करीत ठिबक संच घेतलेला आहे. ठिबकमुळे कमी पाणी लागत असले तरी, पाणीटंचाई असल्याने बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

नवीन कळ्या लागू शकल्या नाहीया उन्हाळ्यात नेहमीपेक्षा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चिकूच्या झाडांना नवीन कळ्या लागू शकल्या नाहीत तर ज्या लागल्या होत्या, त्यापण गळून गेल्या. उष्णता व पाणीटंचाईमुळे फळे झाडावरच पिकली. पैकी काहीची गळ झाली. त्यामुळे सगळी फळे विक्रीसाठी उपलब्ध झाली नाहीत. परिणामी मोठे नुकसान झाले.- सोपान विठ्ठलराव लोंढे, शेतकरी, रामनगर

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रwater scarcityपाणी टंचाई