शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

वाळूजमध्ये नागरिकांची महावितरणवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 8:34 PM

वाळूजला सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली.

वाळूज महानगर : वाळूजला सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र कार्यालयात जबाबदार अधिकारी हजर नसल्याने कर्मचाऱ्यालाच निवेदन देवून माघारी परतावे लागले.

वाळूजला काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा वाढला आहे. त्यात वीज सारखी गुल होत असल्याने नागरिकांना गर्मी बरोबरच विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विजयनगर व पत्रा कॉलनी भागात तर विजेची समस्या आहे. या भागाला कमी दाबाने विजपुरवठा होत केला जात आहे. पाण्याच्या मोटारी चालत नसल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी लगतच्या परिसरात भटकंती करावी लागत आहे. विजेअभावी अनेक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने या भागाला थ्री फेज वरुन विजपुरवठा करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. मात्र याकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विजयनगरातील रहिवाशांनी बुधवारी थेट महावितरण कार्यालय गाठले.

मात्र, कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करुन तेथील कर्मचारी दराडे यांना निवेदन दिले. ८ एप्रिल पर्यंत विजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी रतन अंबिलवादे, सुलेमान शेख, विठ्ठल त्रिभुवन, बशीर पठाण, रज्जाक शेख, सीमा थोरात, शोभा जाधव, शिल्पा जाधव, सोनाली हिवाळे, छाया त्रिभुवन, मनिषा हिवाळे, सुजाता बागुल, संगीता त्रिभुवन, शालू थोरात, सुरेखा वंजारे, जया थोरात, सविता त्रिभुवन आदी उपस्थित होते.या प्रकरणी वाळूज महावितरण केंद्राचे अभियंता महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Walujवाळूज