शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
4
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
5
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
6
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
7
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
8
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
9
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
10
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
11
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
12
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
13
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
14
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
15
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
16
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
17
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
18
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
19
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
20
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा; जलयुक्त, जलपुनर्भरण झालेल्याच वर्षी पाणीपातळीत वाढ

By संदीप शिंदे | Updated: March 28, 2024 16:55 IST

उदगिरात ३५ टक्क्यांनी पर्जन्यमान घटले, जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...

उदगीर : तालुक्यात गेल्या ३५ वर्षांत केवळ पाच-सहा वेळा जलयुक्त व जलपुनर्भरणाची कामे झाली. तेव्हाच पाणी पातळीत वाढ होऊन तालुका टँकरमुक्त झालेला होता. पाण्याची ओरडही कमी झाली होती. मात्र, पर्यावरणाच्या विनाशामुळे उदगीरचे सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या ५८ वर्षांच्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता उदगीर तालुक्यात तब्बल ४३ वर्षे सरासरी इतका पाऊस झालेला नाही.

उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते ९०० मि.मी. एवढे आहे. १९६५ पासून केवळ १३ वर्षेच एक हजार मि.मी.च्या वर पाऊस होऊन तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली होती. १९७१ साली ३८९ मि.मी. व १९७२ साली केवळ १७९ मि.मी. एवढाच पाऊस झाला होता. ही दोन्ही वर्षे दुष्काळी वर्षे म्हणून प्रसिद्ध होती. १९८६, १९९२, १९९४ सालीही या तालुक्यात ५०० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कालावधीत पर्यावरणाचा विनाश कमी असल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत होते. अन्नधान्याचा तुटवडा व रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आजघडीला ही परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी एक दोन वर्षे झाली की, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावीच लागते. २००४ साली तालुक्यात ७२४ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. त्यावर्षी महसूल, ग्रामविकास, कृषी अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तालुक्यात जलपुनर्भरणाचे काम मोठ्या प्रमाणात केले होते. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली गावे अधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन त्या गावात जलपुनर्भरणाचे प्रयोग यशस्वी केले होते. त्यामुळे ही गावे टँकरमुक्त झाली होती. मात्र, आता पुन्हा पहिल्यासारखी टंचाईची स्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.

जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...शासनाच्या वतीने चार-पाच वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. शिवाय उदगीर येथील पाणीदार चळवळीच्या वतीने तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे संपूर्ण उदगीर तालुक्यातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती दूर झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त व जलपुनर्भरणाकडे शासनासह सर्वच लोकांनी पाठ फिरवली असल्यामुळे यावर्षी पर्जन्यमान कमी होऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील सर्वच तलावातील पाण्याच्या पातळ्या शेवटच्या घटका मोजत आहेत.

वृक्षारोपण, संवर्धनाचे काम कागदावरच...गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम कागदावरच सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या, वाळूचा उपसा, पोखरले जाणारे डोंगर व प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्षतोड यामुळे पावसाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. हे अभियान राबविण्यासाठी निकष घालून दिले आहेत. हे निकष वगळून सरसकट गावांतून हे अभियान राबविण्यासाठी सक्ती करावी अशी पाणीदार चळवळीत काम करणाऱ्या लोकांची मागणी आहे. पुढच्या काळात जलपुनर्भरणाच्या दृष्टीने प्रयत्न न झाल्यास व पर्यावरणाचा विनाश चालूच राहिल्यास तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानही इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीRainपाऊस