शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 17, 2022 3:44 PM

डिजिटल बँकिंगने करून दाखविले, यूपीआयमुळे एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : तुम्ही स्वत:लाच विचारा की, आपण मागील किती महिन्यांपासून एटीएममध्ये जाऊन रोख रक्कम काढली? काही जण म्हणतील महिनाभरापूर्वी, काही म्हणतील सहा महिने, तर काही जण सांगतील वर्षभरापासून मी एटीएममध्ये गेलोच नाही. पूर्वी पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा एटीएमवर जावे लागत असे. मात्र, आता बँकच प्रत्येकाच्या खिशात सामावली आहे. मागील वर्षभरात शहरात डिजिटल व्यवहार ५० टक्क्यांनी वाढले. याचा परिणाम, आधीच बँकेच्या कॅश काऊंटरवर झाला होता, आता एटीएमवरही होणे सुरू झाले आहे. ३० टक्क्यांनी एटीएमवरील व्यवहार कमी झाल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे.

एटीएमच्या गर्दीवर परिणाममहाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सांगितले की, यूपीआयमुळे त्यांच्या एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. पूर्वी एटीएमवर गर्दी दिसत होती, आता ती दिसत नाही. दिवाळीतही कोणत्याच एटीएमवर रोख काढण्यासाठी मोठ्या रांगा दिसल्या नाही.

पगार खिशात नव्हे मोबाइलमध्येचवर्षभरापूर्वी कर्मचारी पगार झाल्यावर ते एटीएममधून काढून घरी आणत. मात्र, आता अनेक जण महिनोन महिने एटीएममध्ये जातच नाहीत. चिल्लर व्यवहारही यूपीआयद्वारे केले जात आहे. यामुळे पगार आता मोबाइलमध्येच राहत आहे.

एटीएम कार्ड विसरण्याचे प्रमाण वाढलेबँक व्यवस्थापकाने सांगितले, एटीएममध्येच कार्ड विसरून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. एका एटीएमवर मागील वर्षभरात ४३ एटीएम कार्ड सापडले. ते घेण्यासाठी लोक पुन्हा येत नाही. ते बँकेत फोन करतात व कार्ड ब्लॉक करून टाकतात. नवीन एटीएम कार्ड घेतात.

सर्वाधिक एटीएम एसबीआयचेचजिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ३१७ एटीएम आहेत. त्यापैकी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे २२७ एटीएम आहेत. १६ खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक १२५ एटीएम आहेत.

व्यवहारात वाढला ‘यूपीआय’ वापरदेशात सध्या दररोज ११ लाख कोटींचे व्यवहार यूपीआयमार्फत होत आहेत. त्यासाठी ६७८ कोटी ट्रान्झॅक्शन केले जात आहे. मे महिन्यातील आकडेवारी १० लाख कोटी होती.

कॅश काऊंटरवर ५० टक्के परिणामएटीएम आल्यापासून बँकेतील कॅश काऊंटरवर २० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला होता. आता यूपीआयमुळे कॅश काऊंटरवरील रोख रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.- हेमंत जामखेडकर, महासचिव, सीबीआयइए

अजून नाही परिणामएसबीआयच्या टाऊन सेंटर येथील एटीएमवर अजून युपीआयचा तेवढा परिणाम झाला नाही. आम्हाला दिवसातून दोन वेळेस एटीएममध्ये रक्कम भरावी लागते.- इम्तियाज परवेज, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय टाऊन सेंटर शाखा

डिजिटल व्यवहाराकडे वाढता कलडिजिटल व्यवहाराकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कोणी जवळ पैसा बाळगण्यास तयार नाही. पैशाची जागा मोबाइलने घेतली आहे. त्याद्वारे खिशातच बँक घेऊन नागरिक फिरत आहे. डिजिटल क्रांती घडत आहे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

पेट्रोल पंपावर ५० टक्के व्यवहार डिजिटलमागील दोन वर्षात यूपीआयमुळे रोख व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. आमच्या पेट्रोल पंपावर दररोज होणारे व्यवहारापैकी ५० टक्के व्यवहार डिजिटल होत आहे. तर उर्वरित ५० टक्के व्यवहार रोख स्वरूपात होत आहे.- अखिल अब्बास, पेट्रोल पंप मालक

जिल्ह्यात ५६६ एटीएमबँक             --- एटीएमपब्लिक सेक्टर बँक -- ३१७प्रायव्हेट बँक---२३९स्मॉल फायनान्स बँक--०७महाराष्ट्र ग्रामीण बँक --- ०१जिल्हा मध्यवर्ती बँक-- ०२(जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त आकडेवारी)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादatmएटीएमbankबँक