शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

जिगरी मित्र जग सोडून गेला; विरहात तरुणाने दुसऱ्याच दिवशी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 7:11 PM

दोन दिवसांत दोघांनी आत्महत्या तर एकाचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

गंगापूर (औरंगाबाद) : जिवलग मित्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी कल्पेश राजू गायकवाड (२५, रा.मांजरी ) याने देखील आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दोन दिवसांत गावांतील हा तिसरा मृत्यू असल्याने मांजरी गांवावर शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील मांजरी येथील पंढरीनाथ रघुनाथ पारे (३६) यांने मंगळवारी नैराश्यातून आत्महत्या केली होती. पारे याचा जिवलग मित्र कल्पेश अतिशय दुःखी होता. कल्पेश पंढरीनाथच्या मृतदेहाला कवटाळून रडत होता. कल्पेश यास आपला मित्र सोडून गेल्याचे दुःख सहन झाले नाही.  त्यामुळे त्याने बुधवारी सकाळी साडे दहाच्या वाजेच्यासुमारास स्वतःच्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. दरम्यान, कल्पेशच्या भावाने त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, विषारी द्रव्य कल्पेशच्या शरीरात सर्वत्र पसरले होते. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत कल्पेशच्या पश्चात पत्नी- मुलगी,आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. 

दोन दिवसात तिघांच्या मृत्यूने मांजरी गावावर शोककळा नागपंचमीच्या दिवशी पंढरीनाथ पारे याची आत्महत्या, तर आज  महाविद्यालयीन विद्यार्थी आदित्यराज सुंब याचा अपघाती मृत्यू आणि कल्पेशची आत्महत्या, अशा दोन दिवसांमध्ये तीन दुर्दैवी घटना मांजरी गावात घडल्या. यामुळे गावावर शोककळा पसरली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद