शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 10:51 PM

हिंगोली : शहरातील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे १५ ते १७ फेबु्रवारीदरम्यान घेतलेल्या जिल्हा ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.

हिंगोली : शहरातील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे १५ ते १७ फेबु्रवारीदरम्यान घेतलेल्या जिल्हा ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. याप्रसंगी प्रमाणपत्र वितरण, व्याख्यान, तसेच विद्यार्थ्यांनी कथा-कथन व काव्यवाचन केले.अशोक अर्धापूरकर, प्रमुख वक्ते उत्तम सूर्यवंशी, प्रमोद पाटील, खंडेराव सरनाईक, विजय हवालदार, प्रा. जी. पी. मुपकलवार, सुभाष साबळे, जया करडेकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रथम उत्तम सूर्यवंशी यांनी वाचन संस्कृतीवर व्याख्यान दिले. ते म्हणाले, ग्रंथाशिवाय मन तयार होत नाही; त्यामुळे वाचनसंस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले, माणसाच्या जीवनामध्ये विचार करणे हेच जिवंतपणाचे लक्षण असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि.रा. शिंदे व यशवंतराव चव्हाण आदींची उदाहरणे देत स्पष्ट करून दाखविले. तसेच विद्यार्थ्यांनी कथा-कथन व काव्यवाचन केले. यावेळी अंजली जावळे हिने मुलींनी जगावे तरी कसे? ही कविता सादर केली. तर कोमल बांगर हिने आई आपल्या मुलाला गरिबीमध्ये जगणे कशाप्रकारे शिकवते याविषयी काव्यकथन केले. तसेच प्रदीप बनसोडे, अदित्य जाधव, मोहन पांचाळ, आदित्य राखुंडे, प्रदीप बनसोडे यांच्यासह सहभागी विद्यार्थ्यांनी विविध काव्यवाचन व कथाकथन करून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अर्धापूरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ग्रंथाशिवाय माणूस घडणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथ आणि ग्रंथालय कपाट असणे आवश्यक आहे. सयाजीराव गायकवाड यांनी गाव तेथे गं्रथालये ही संकल्पना मांडली होती. परंतु सध्या असे चित्र दिसून येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रा.विलास वैद्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. ग्रंथालय संघातर्फे यासाठी परिश्रम घेण्यात आले. (प्रतिनिधी)