शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 13:28 IST

Heavy RainFall in Marathawada : ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १९ टक्के पंचनामे पूर्ण झाले २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पथके

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ( Heavy RainFall in Marathawada) २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची या महिन्याच्या १४ तारखेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम विभागीय पातळीवर सुरू असून, आजवर १९ टक्के शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत महसूल, कृषी विभागाची पथके पोहोचली आहेत. ( Cloudburst at 42 places in Marathwada; Massive loss of 20 lakh 39 thousand farmers) 

हेक्टरचा विचार केला तर २५ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनाम्याअंती किती हेक्टवरील पिके वाया गेली, त्याचा अहवाल समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले. १ सप्टेंबरपासून आजवर कमी-अधिक प्रमाणात विभागात अतिवृष्टी झाली. सुमारे २५० मंडळांत पावसाने दाणादाण उडवून दिली. यात कापूस, मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक वाया गेले. त्याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे.

४२ ठिकाणी ढगफुटी; मराठवाडा हादरला७ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. मराठवाड्यात सर्वाधिक ४२ हून अधिक ठिकाणी असा पाऊस एकाच दिवसात झाला. या पावसामुळे जीवितहानी झाली, पशुधनाचे नुकसान झाले. शिवाय घरांची पडझड, रस्ते, पूल खचले. मराठवाड्यात लाखो एकर शेतीचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले. कापूस, तूर, मूग, मका, सोयाबीन, बाजरीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीची आगाऊ सूचना मिळावी, यासाठी डॉप्लर रडार विभागात बसविणे आवश्यक आहे. वित्त व जीवितहानी तसेच शेतीचे नुकसान टाळण्यासाठी डॉप्लर रडार मराठवाड्यात तातडीने बसविणे गरज असल्याचे हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

जिल्हा-----बाधित शेतकरी---- झालेले पंचनामे---टक्केवारी

औरंगाबाद-- ३२६९३५ ------ २९३२८-------१७ टक्के

जालना----२६१२९८------ २६०६३-------११ टक्के

परभणी---२२२७९४ ------ २२९४४-------१४ टक्के

हिंगोली---११५०० ------ १०२५--------११ टक्के

नांदेड----४५१५८८------- २९६७२-------०७ टक्के

बीड-----७३७२२५----- १५०६६०------२९ टक्के

लातूर----८४९० ------ २५७४--------४० टक्के

उस्मानानाबाद--१९२२८------ ८४६०--------८० टक्के

एकूण -----२०३९६८८-----२७०७२७--------१८ टक्के

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद