शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘आओ अपना शहर बनायें’; शहर बदलाची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 11:41 IST

‘लोकमत’ कार्यालयास शुक्रवारी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली.

ठळक मुद्देआयुक्त म्हणून पदभार घेण्यापूर्वी मी एक नागरिक म्हणून या शहरात वावरलो होतो. सर्वसामान्य नागरिकाला कोणकोणत्या अडचणी येतात याची नोंद मी वेळोवेळी ठेवली. २० वेगवेगळ्या मुद्यांवर आपल्याला शहरात काम करावयाचे असे ठरविले.

औरंगाबाद : ‘आओ अपना शहर बनायें’ही हॅशटॅग थीम ठेवून शहरात काम सुरू केले आहे. शहर बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. हे सर्व करीत असताना आर्थिक स्रोत मजबूत करणे, एक रुपयाही खर्च न करता अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. रस्ते, पाणी, पार्किंग, हॉकर्स झोन, घनकचरा, ऑक्सिजन हब आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यात येईल, असे मत महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.

‘लोकमत’ कार्यालयास शुक्रवारी पाण्डेय यांनी सदिच्छा भेट दिली.  ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत असताना औरंगाबाद शहरात अनेकदा येत होतो. शहरातील परिस्थिती बघून मनाला वेदना होत असत. पत्नी मोक्षदा पाटील (पोलीस अधीक्षक) हिच्यासोबत या विषयांवर तासन्तास चर्चा होत असायची. तिनेच मला एक दिवस या सर्व बकाल स्वरुपाला आकार देण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या असा सल्ला दिला. हा सल्ला चांगला वाटला. वरिष्ठांना विनंती केली. औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून कोणीतरी येण्यास उत्सुक असल्याने तेसुद्धा खुश झाले. आयुक्त म्हणून पदभार घेण्यापूर्वी मी एक नागरिक म्हणून या शहरात वावरलो होतो. त्यामुळे शहरात सर्वसामान्य नागरिकाला कोणकोणत्या अडचणी येतात याची नोंद मी वेळोवेळी ठेवली. त्यानंतर २० वेगवेगळ्या मुद्यांवर आपल्याला शहरात काम करावयाचे असे ठरविले. त्याच अनुषंगाने कामाला सुरुवात केली आहे. 

महापालिकेत येण्यापूर्वी तिजोरीत १४ लाख रुपये होते. सर्व परिस्थिती नकारात्मक होती. अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कॉन्फीडन्सचा अभाव होता. महापौर नंदकुमार घोडेले स्वत: चांगले काम करीत आहेत. त्यांच्यासह राजकीय मंडळींनाही पुढील वाटचालीत सामावून घेतले. लोकसहभागावर माझा दांडगा विश्वास आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी यशही मिळाले.

थकबाकीचा डोंगर, उत्पन्नाचा अभावकंत्राटदारांची २८६ कोटींची बिले प्रलंबित होती. उत्पन्नाचा अभाव अशी मनपाची आर्थिक स्थिती होती. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर सर्वाधिक भर दिला. आतापर्यंत मालमत्ता करात १०० कोटी वसूल केले. पाणीपट्टीचे रेकॉर्ड मनपाकडे नव्हते. हे रेकॉर्ड मिळविले. आता पाणीपट्टीची वसुली २५ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

३०० टन कचऱ्यावर दररोज प्रक्रियाचिकलठाणा येथे दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. पडेगाव येथील प्रकल्प महिन्या-दोन महिन्यात पूर्ण होणारच आहे. तेथेही १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. कांचनवाडीत ओल्या कचऱ्यापासून गॅसनिर्मिती करून  हा गॅस शिवभोजनाला वापरण्याची योजना आहे. महापालिकेच्या मालकीच्या वजन काट्यावर लवकरच कचरा मोजला जाणार आहे.

प्रक्रिया केलेले पाणी शहरात आणणारकांचनवाडी येथे १५१ एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्लँट आहे. दररोज दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. या पाण्याचा उपयोग लवकरच शहरासाठी करण्यात येणार आहे. बीड बायपास, कांचनवाडी आणि झाल्टा येथे पाणीपुरवठा केंदे्र तयार करण्यात येतील. नागरिकांना नाममात्र शुल्कात टँकर भरून नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील एमआयडीसी, वाळूजला हे पाणी ६० टक्के देण्यात येईल. या उपक्रमात एमआयडीसी, महापालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. पण वापरण्यासाठी पाणी तर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कामासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही हिरवा कंदिल दाखविला आहे. शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनाही हे पाणी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाला दरमहा विजेचा खर्च ५५ ते ६० लाख रुपये येत असून, सौरऊर्जेचा वापर करून हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील वॉशिंग सेंटर चालकांनाही हेच पाणी वापरावे म्हणून सक्तीचे केले जाईल. जमिनीतील पाणी ही समाजाची संपत्ती आहे. 

१०० कोटींच्या रस्त्यांचे सौंदर्यीकरण१०० कोटीत रस्त्यांची कामे झाल्यावर सौंदर्यीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या कंत्राटदारांनी हे काम घेतले आहे, त्यांना सीएसआर फंडातून २ टक्केरक्कम खर्च करावी लागते. त्यांच्याकडूनच हे काम करून घेण्यात येणार असून, त्यांना मुदतवाढ हवी असेल तर हे करावेच लागेल. सौंदर्यीकरणात झाड लावणे, दुभाजक, फुटपाथ आदी कामे करावयाची आहेत.

घरी बसून कर भरामालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना यापुढे महापालिकेच्या कोणत्याच वॉर्ड कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित केला जाणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांना घर बसल्या कर भरता येईल. महापालिकेचे ई-गव्हर्नन्सही दोन ते तीन महिन्यांत पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. घर तिथे कर संकल्पना सुरूच आहे. घरांवर यापुढे मालमत्ता क्रमांक येईल. हा क्रमांक मालक बदलला तरी जशास तसा राहील.

नवीन पाणीपुरवठा योजनेत नळांना मीटर1680 कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी किमान ३ वर्षे लागतील. शहरात सध्या आणण्यात येणाऱ्या पाण्याची क्षमता वाढविण्यात येईल. काही पंप बदलले जाणार आहेत. उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर बनतो. त्यापूर्वी काही ठोस पावले उचलली जातील. नवीन पाणीपुरवठा योजनेत विजेचा खर्च प्रचंड येईल. मनपाला हे परवडणारे नाही. त्यासाठी सौरऊर्जेचा वापर कल्पकतेने करण्यात येणार आहे. या योजनेत नळांना मीटर बसविण्यात येणार आहे. जेवढ्या पाण्याचा वापर तेवढे बिल नागरिकांना येईल.

पाणीपट्टीचे दर कमी होणारदरवर्षी चार हजार रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. पाणीपट्टीचे दर कमी करण्यासंदर्भात काम सुरू आहे. एप्रिलपासून नवीन दर लागू होतील. शहरातील बाजारपेठेत दिवसभर एका जागेवर बसून व्यवसाय करणाऱ्यांकडून किरकोळ स्वरुपात टॅक्स वसूल करण्यात येईल. शहरातील पार्किंग, हॉकर्स झोनवरही काही दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नTaxकर