शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गावागावांत तंटे वाढले, तंटामुक्त समित्या कागदावरच; ना पोलिस, ना जिल्हा परिषदेला गांभीर्य

By विजय सरवदे | Published: September 26, 2023 4:27 PM

मागील काही वर्षांपासून या समित्या नावापुरत्याच राहिल्या असून, गावागावांत तंटे व अवैध धंदे वाढले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : गावातील तंटे गावातच मिटावेत. यामुळे एक तर गावात सामाजिक सलोखा‎ निर्माण व्हावा आणि पोलिसांवरील ताण कमी व्हावा, यासाठी तंटामुक्त समिती अभियान राबविण्यात येत आहे. पण, अलीकडे मागील काही वर्षांपासून या समित्या नावापुरत्याच राहिल्या असून, गावागावांत तंटे व अवैध धंदे वाढले आहेत. दरम्यान, या अभियानाबाबत शासनच अनभिज्ञ असल्यामुळे पोलिस आणि जि.प. प्रशासनालाही या संदर्भात आता फारसे गांभीर्य राहिलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ८६७ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी गावातील वाद पोलिस ठाण्यांपर्यंत न नेता तो गावातच मिटविला जावा तसेच गावात अवैध धंद्याला रोख लावण्यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राबविण्याचा निर्णय तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ पासून अंमलात आणला. त्यानंतर आठ- दहा वर्षे हे अभियान चांगल्या प्रकारे चालले. ज्या गावात एकही वाद नाही, अवैध धंदे नाहीत, अशा तंटामुक्त समित्यांना शासनाने लाखोंची बक्षिसे दिली. हा निधी ग्रामनिधीच्या स्वरुपातून गावाच्या विकासकामांवर खर्च करण्याची अनेक उदाहरणे आहेत. पण, अलीकडे तंटामुक्त समित्यांचा अध्यक्ष बनण्यासाठी राजकीय मंडळींमध्ये चुरस वाढली. त्यामुळे या समित्यांचे महत्त्व कमी होत गेले. सध्या जिल्ह्यात तंटामुक्त समित्या किती कार्यरत आहेत, याची माहिती ना पोलिस ठाण्यांना आहे, ना जिल्हा परिषद प्रशासनाला.

ऑक्टोबरमध्ये ग्रामसभेत होते निवडया संदर्भात जि. प. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तंटामुक्त समित्या स्थापन करण्यापर्यंत जिल्हा परिषदेची भूमिका असते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेत या समित्यांच्या अध्यक्षांची निवड केली जाते. मात्र, सध्या या समित्यांच्या अस्तित्वाबद्दल खुद्द जि. प. प्रशासनही अनभिज्ञ आहे. समित्या स्थापन झाल्यानंतर पोलिस आणि समिती यांच्यात सुसंवाद असावा लागतो. पण, पोलिस प्रशासनालाही या समित्या अस्तित्वात आहेत की नाही, याबद्दल माहिती नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषदPoliceपोलिस