शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचितांची मतदारसंघ बांधणी वेगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:21 IST

शिवसेना-भाजप युतीला टक्कर देण्यासाठी उमेदवारांनी सुरू केलाय जनसंपर्क 

ठळक मुद्देशहरातील तिन्ही मतदारसंघात वंचित आघाडी कामाला लागली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप अस्पष्ट युतीला एकतर्फी विजय मिळविणे अवघड

औरंगाबाद : जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना-भाजप युतीमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या नावाने चर्चा होत असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससहवंचित बहुजन आघाडीने मतदारसंघ बांधणी वेगाने सुरू केली आहे. युतीला टक्कर देण्यासाठी संभाव्य उमदेवारांनी मतदारांशी लोकसभा निवडणुकीपासूनच संपर्क सुरू केलेला आहे. त्यामुळे युतीला एकतर्फी विजय मिळविणे अवघड होणार आहे. 

जिल्ह्यात वैजापूरवगळता एकही मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेसच्या आघाडीकडे नाही. त्यामुळे आघाडीने जिल्ह्यात इच्छुकांच्या मुलाखती घेऊन तुल्यबळ उमेदवारांचा शोध घेतला आहे. वैजापूरचे आ. भाऊसाहेब चिकटगावकर हे इतर पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या होत्या; परंतु सध्या तरी तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे चित्र आहे. पैठणमधून राष्ट्रवादीने तयारी पूर्ण केली आहे. फुलंब्रीत माजी आ. कल्याण काळे यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. माजी आ. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तेथे काँग्रेसमधील दुसरी फळी लोकसभा निवडणुकीपासूनच कामाला लागली आहे. पालोदकर यांनी मतदारसंघाकडे ताकदीने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कन्नडमधून माजी आ. नामदेव पवार यांनीही काँग्रेसकडून मतदारसंघाचा पूर्ण आढावा घेतला आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील उमेदवारीबाबत अजून काही निर्णय झाला नसला तरी ऐनवेळी युतीतून नाराज झालेला तगडा उमेदवार आघाडीकडून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम मतदारसंघातही काँग्रेसने संपर्क सुरू ठेवला आहे. मध्य आणि पूर्व मतदारसंघात काँगे्रसचे अजून काहीही ठरलेले नाही. युतीचा सर्वत्र बोलबाला असला तरी वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनेही मोठ्या ताकदीने जिल्हा पोखरला आहे. 

या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्याप पत्ते ओपन केलेले नाहीत. मनसेचे येथील संघटन कोलमडल्यामुळे पक्षाकडून उमेदवार देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मनसेने जर वंचित किंवा आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे उमेदवार कदाचित विधानसभेच्या मैदानात नसतील, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

वंचित आघाडीही सरसावली 

शहरातील तिन्ही मतदारसंघांपैकी पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने कामाला सुरुवात केलेली आहे. २०१४ च्या पराभूत उमेदवारांपैकी पूर्व मतदारसंघात एकाने संपर्क अभियान वेगाने सुरू केले आहे. पश्चिम मतदारसंघात वंचितचा उमेदवार जवळपास निश्चितच आहे. मध्यमधून खा. इम्तियाज जलील ठरवतील तो उमेदवार समोर येईल. एमआयएम व भारिप यांच्यातील जागावाटपानंतरच सर्व काही निश्चित होणार असले तरी सध्या उमेदवारांना संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद, फुलंब्री या मतदारसंघातूनही वंचित आघाडीने उमेदवार हेरले आहेत. ऐनवेळच्या राजकीय उलथा-पालथीमध्ये फुलंब्रीतून ओबीसी चेहरा वंचितमधून पुढे आला तर नवल वाटू नये. 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभा