शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

डीएमआयसीसोबत समृद्धी महामार्गाच्या ‘कनेक्टिव्हिटी’चा गुंता सुटता सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:35 IST

Samruddhi Mahamarga ‘एमआयडीसी’चे संचालक मंडळ पेचात  

ठळक मुद्देदर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याही फुकट!

औरंगाबाद : दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याही फुकट, अशा मानसिकतेतून समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा गुंता वाढत चालला आहे. ‘नागपूर-मुंबई’ व्हाया औरंगाबाद या सुपर एक्स्प्रेसवे अर्थात समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’ची ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यास राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयारी दर्शविली खरी. मात्र, समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम आणि इंटरचेंजच्या कामाचे पैसे देण्याच्या अटीवरून ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळासमोर पेच निर्माण झाला आहे. 

झाले असे की, ‘डीएमआयसी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये बहुराष्ट्रीय तसेच देशातील मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ने समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीबाबत चार महिन्यांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळासमोर प्रस्ताव मांडला होता. तोपर्यंत या महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोहोचले होते. तरीही उद्योगमंत्री सुभाष देसाई व आदित्य ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने सशर्त तयारी दर्शविली. या ‘सुपर एक्स्प्रेस वे’च्या निकषानुसार जोडणाऱ्या रस्त्याचे डिझाईन ‘एमआयडीसी’ला दिले. दिलेल्या डिझाईननुसार रस्त्याचे काम ‘एमआयडीसी’ने करावे. कनेक्टिव्हिटीच्या ठिकाणी इंटरचेंजचे काम ‘मेगा इंजिनिअरिंग ही’ समृद्धी महामार्गाची कंत्राटदार संस्था करेल. या कामासाठी लागणारा अंदाजित २० ते २५ कोटी रुपयांची रक्कम ‘एमआयडीसी’ने द्यावी, या अटी ‘एमएसआरडीसी’ने घातल्या आहेत. नेमक्या या अटी एमआयडीसीला रुचलेल्या दिसत नाहीत. 

‘एमआयडीसी’च्या कार्यालयीन सूत्रांनी सांगितले की, ‘एमएसआरडीसी’ने कनेक्टिव्हिटी देण्यासाठी मान्यता दिली असली, तरी त्यांचा हा खर्चिक प्रस्ताव एमआयडीच्या संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. संचालक मंडळ काय निर्णय घेते, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे तूर्तास तरी भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली नाही. ही कनेक्टिव्हिटी शेंद्रा व जयपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. 

पावसामुळे रखडले बोगद्याचे काम‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले की, पावसामुळे समृद्धी महामार्ग व बोगद्याच्या कामात थोडा व्यत्यय आला होता. आता पाऊस थांबलाय. आता गतीने काम सुरू होईल. सावंगीजवळ बोगदा तयार केला जात आहे. बोगद्याच्या कामासाठी डोंगर कोरणारी मशीन हैदराबाद येथून मागविण्यात आली आहे. पावसामुळे ती इथपर्यंत पोहोचू शकत नव्हती. दोन मशीनच्या माध्यमातून एकाच वेळी दोन्ही बाजूने बोगद्याचे काम आठवडाभरात सुरू होईल. डिसेंबरअखेरपर्यंत बोगदा तयार होईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबाद