शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

'मोदीजी, तुमची पात्रता काय? नेहरुंसमोर तुम्ही काहीच नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 20:59 IST

मोदी- शहा रा. स्व. संघाचा अजेंडा राबवीत आहेत. परंतु भारतवासी हा अजेंडा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही’

ठळक मुद्देमोदी आप नेहरू के सामने कुछ भी नहीं. गलती से कुछ लोग बडे हो जाते है इस देश के लोगोने आप को प्रधानमंत्री बनाया है. आपको निकालने का काम भी जनताही करेगी.

औरंगाबाद : ‘मोठ्या मेहनतीने हा देश घडलाय. पं. जवाहरलाल नेहरू यांनी या देशाची घडी नीट बसवलीय. परंतु सध्या खोटे बोलण्याचे राजकारण सुरू आहे. केवळ तीन टक्क्यांसाठी हा देश हिंदुराष्ट्र बनविण्याचे षड्यंत्र रा. स्व. संघातर्फे रचण्यात येत आहे. मोदी- शहा रा. स्व. संघाचा अजेंडा राबवीत आहेत. परंतु भारतवासी हा अजेंडा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही’ असा हल्लाबोल आज येथे खा. हुसेन दलवाई यांनी केला. 

मौलाना आझाद विचार मंचच्या तीनदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मौलाना आझाद संशोधन केंद्र, मजनूहिल येथे एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव ऊर्फ बाबूराव कदम यांच्या हस्ते सकाळी या शिबिराचे उद्घाटन झाले. विचारवंत जावेद अख्तर, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख हे या शिबिराला येऊ शकले नाहीत. मोदी- शहा जास्त मग्रुरी दाखवू नका, असा इशारा यावेळी दलवाईंनी दिला. मोदीजी, तुमची पात्रता काय? नेहरुंसमोर तुम्ही काहीच नाही. काही माणसं चुकून मोठी होतात. या देशातल्या जनतेनं तुम्हाला पंतप्रधान केलं आहे. तुम्हाला त्या पदावरुन हटवण्याचं कामदेखील जनतेचा करेल, असं दलवाई म्हणाले.एनआरसी, एनपीआरचा कोणताही अर्ज आम्ही भरणार नाही, असे बजावत दलवाई यांनी टीका केली की, आमच्या पूर्वजांनी कधीही ब्रिटिशांची दलाली केली नाही. हिटलरची स्तुती केली नाही. गोबेल्स नीतीचा वापर करणं, खोटे बोलणं, द्वेष करणं हे तुमचे काम. आमचं नाही. गोमांस खाल्लं म्हणून ठार मारण्याचा कुणाला अधिकार नाही. परंतु याच मुद्यावरून अखलाकला ठार मारण्यात आलं, असं दलवाई पुढे म्हणाले. 

पहिल्यांदा मोदी-शहा यांनी आपलं नागरित्व सिद्ध करावं, असं आव्हान देत मुणगेकर यांनी या देशातल्या राजकीय पक्षांनी एनआरसी, सीएए व एनआरपीविरुद्ध असहकार पुकारावं, असं आवाहन केलं. उद्घाटक बाबूराव कदम यांनी गौतम बुद्धानं सांगितलेल्या धर्माच्या व्याख्येकडे उपस्थितांचं लक्ष वेधलं. पाप करू नये, पुण्यकर्म करावं व चित्त निर्मळ ठेवावं, असं बुद्धानं सांगितलं. आज धर्माच्या नावानं वादळं उठविली जात आहेत. ती निरर्थक आहेत, असं कदम यांनी नमूद केलं. संजय लाखे पाटील, युसूफ मुकाती, साथी सुभाष लोमटे, माजी खासदार उत्तमसिंग पवार यांची यावेळी भाषणे झाली. युसूफ अन्सारी यांनी सूत्रसंचालन केलं. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पटेल, नायब अन्सारी, मुकीम देशमुख, आबेदाआपा आदींची मंचावर उपस्थिती होती.

मोदी- शहा देशाला विनाशाकडे घेऊन जात आहेत या सत्रात माजी खासदार व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे मर्मग्राही भाषण झाले. मोदी- शहा आज जे काही करीत आहेत, त्यातून ते देशाला विनाशाकडे घेऊन जात आहेत, असे स्पष्ट मत मुणगेकर यांनी नोंदविले. ४त्यांनी सांगितले की, २०१४ पर्यंत या देशात उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता होती. त्यानंतर या देशात प्रतिक्रांती झाली. अच्छे दिन आयेंगे, दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार उपलब्ध करून देऊ, पंधरा लाख रु. तुमच्या खात्यावर जमा करूअशी खोटी आश्वासने दिली गेली. त्यातील एकही पूर्ण केले गेले नाही. मोदी- शहा देश मागे घेऊन जात आहेत. किंबहुना ते देशाला विनाशाकडे घेऊन जात आहेत.

टॅग्स :Hussein Dalwaiहुसेन दलवाईAurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकर