शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

कोरोना इफेक्ट : मसाल्याची मागणी अन् कोरोनाच्या भीतीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 4:06 PM

आता जसजशी अनलॉक प्रक्रिया सुरू झाली, तसतशी लोकांच्या मनातून कोरोनाची भीतीही कमी होत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आता काढ्याचे नियमित सेवनही थांबविले आहे. 

ठळक मुद्देसध्या पावसाळा असूनही या पदार्थांच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येते. हळद, सुंठ, दालचिनी, लवंग, मिरे, ओवा यांची चारपटीने मागणी वाढली होती

औरंगाबाद : मार्च महिन्याच्या मध्यावर कोरोना भारतात अवतरला आणि त्यानंतर कोरोनाच्या भीतीमुळे कडाक्याचा उन्हाळा असूनही उष्ण पदार्थांची मागणी तीव्रतेने वाढत गेली. आता मात्र कोरोनाच्या भीतीमध्ये जसजशी घट होत आहे, तसतशी घट आता उष्ण पदार्थांच्या मागणीतही होताना दिसते आहे.

कोरोनाचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे सर्दी आणि खोकला. सर्दी, खोकला होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण सतर्क होता. परिणामी उष्ण पदार्थ सेवन करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत गेली. अशातच आयुष मंत्रालयातर्फे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काढा कसा करायचा, हे सांगण्यात आले. त्यानुसार बहुतांश लोकांनी हळद,  सुंठ, काळे मिरे, ओवा, दालचिनी, लवंग या पदार्थांपासून काढा तयार केला आणि त्याचे नियमित सेवन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऐन उन्हाळा असतानाही या पदार्थांच्या मागणीत चारपट वाढ  झाली  होती, असे मोंढ्यातील व्यापारी श्रीकांत खटोड यांनी सांगितले.

एरवी उन्हाळा असताना उष्ण पदार्थांची मागणी घटत जाते आणि थंड पदार्थांची मागणी वाढत जाते, परंतु यावर्षीच्या उन्हाळ्यात मात्र कोरोनाच्या भीतीमुळे पूर्णपणे विरुद्ध चित्र दिसून आले. अनेक घरांमध्ये तर सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याआधीच या पदार्थांपासून केलेला काढा सेवन केला जायचा.  काही  घरांमधील महिलांनी तर एकेक किलो काढा तयार करून ठेवला होता. यासोबतच लसूण, अद्रक यांची मागणीही वाढली. व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत असणारे लिंबू आणि पपई यांनाही चांगलीच मागणी होती. तसेच आवळ्याच्या पदार्थांच्या मागणीमध्ये वाढ होते. काढ्यासोबत अनेक जण मध आणि गूळ हे उष्ण पदार्थही सेवन करायचे. त्यामुळे दालचिनी, हळद,  सुंठ,  लवंग, मिरे याखालोखालच मध, गूळ, गवती चहा यांनाही मागणी होती, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यfoodअन्न