शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

कोरोना रुग्ण, मृत्यूही वाढले,पण जिल्ह्यात मृत्युदरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:02 AM

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. मात्र, जिल्ह्यातील मृत्युदरात घट झाली ...

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. मात्र, जिल्ह्यातील मृत्युदरात घट झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचा आणि जिल्ह्याचा मृत्युदर जवळपास सारखाच आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती. परंतु फेब्रुवारी महिना उजाडताच कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ सुरू झाली. गेल्या दीड महिन्यांत ११ हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची जिल्ह्यात भर पडली. त्यापाठोपाठ पुन्हा एकदा कोरोनाच्या रोजच्या मृत्यूचक्राला सुरुवात झाली आहे. मागील दीड महिन्यांत १०६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोना रुग्ण, मृत्यू वाढत असले तरी जिल्ह्याच्या मृत्युदरात मात्र घट झाली आहे. दीड महिन्यांत मृत्युदर २.६३ टक्क्यांवर २.२८ टक्क्यांवर घसरला आहे. राज्याचा मृत्युदर २.२७ टक्के आहे. त्यामुळे राज्याचा आणि जिल्ह्याचा मृत्युदर सारखाच आहे. कोरोनाविरुद्ध खासगी असो अथवा शासकीय रुग्णालये, सर्वजण कोरोना लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रितपणे लढा देत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणायचे आणि मृत्यू कसे रोखायचे, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेलाही पडत आहे.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती

१) मृत्युदर

१ फेब्रुवारी - २.६३ टक्के

१५ मार्च - २.२८ टक्के

------

राज्याचा मृत्युदर-२.२७ टक्के

जिल्ह्यात १ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान १०६ मृत्यू, ११,८१६ नवे रुग्ण.