शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Corona Virus : पहिल्या लाटेत ४३ हजार, दुसऱ्यात १ लाख रुग्ण, तर तिसऱ्यात किती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 20:15 IST

Corona Virus in Aurangabad News : तिसर्‍या लाटेत ‘डेल्टा प्लस’ या नवीन म्युटेशनचा संसर्ग पसरण्याची शक्यता वर्तवली आहे.

ठळक मुद्देग्रामीणमध्ये संथगतीने लसीकरणशहरात लसीचा तुटवडा

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग मार्च २०२० मध्ये पहिल्यांदा शहरात पाहायला मिळाला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात ४३ हजार ७०० बाधित आढळून आले. दुसर्‍या लाटेत आकडा दुपटीने वाढला. तब्बल १ लाख २ हजार ५०८ नागरिकांना लागण झाली. आता तिसर्‍या लाटेत ‘डेल्टा प्लस’ या नवीन म्युटेशनचा संसर्ग पसरण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तिसरी लाट आलीच, तर यात जिल्ह्यातील बाधितांची संख्या किती होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ( 43,000 in the first wave, 1 lakh in the second, and how many in the third?) 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३० जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ४६ हजार २०८ बाधित निघाले. त्यापैकी १ लाख ४२ हजार १३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर ३ हजार ४२६ बाधितांचा मृत्यू झाला. पहिल्या लाटेत मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान जिल्ह्यात एकूण ४३ हजार ७०० बाधित आढळून आले. मात्र मार्च ते जून या चारच महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तब्बल १ लाख २ हजार ५०८ बाधित आढळून आले.

जिल्हा सुरक्षित ठेवायचा, तर लस हवीजुलै महिन्यात मागील तीन दिवसांपासून ग्रामीण भागातील रुग्णांची रोजची संख्याही कमी आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात लसीकरणाला पाहिजे तसा वेग मिळत नाही. शहरात लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने मोहिमेत वारंवार व्यत्यय येत आहे. शहरात किमान ७० टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे मत यापूर्वीच मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले आहे.

चार महिन्यात २ हजार १५८ रुग्णांचा मृत्यूपहिल्या लाटेत औरंगाबादेत बाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यावेळी राज्य आणि जिल्ह्याच्या तुलनेत शहराचा मृत्यू दर हा ५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. दुसऱ्या लाटेत मात्र ग्रामीण व राज्याच्या तुलनेत शहराचा मृत्यू दर कमी होता. जिल्ह्यात १ मार्च ते ३० जून या कालावधीत एकूण २ हजार १५८ बाधितांचा मृत्यू झाला. बाधितांच्या तुलनेत मृत्यू दराचे प्रमाण २.१० टक्के आहे.

लसीकरणाचा फायदा होईलतिसरी लाट आली तरी, त्यात जीवित हानी कमी होईल. लसीकरण फॅक्टर आपल्याकडे आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेत हार्ड इम्युनिटी नव्हती. अशासकीय संस्थांनी तिसऱ्या लाटेबद्दल वेगवेगळी भाकीते वर्तविली आहेत. शासनाकडून अद्याप अधिकृतपणे असा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. संभाव्य लाट गृहित धरून तयारी सुरू आहे. ‘डेल्टा प्लस’ कशा पद्धतीने संसर्ग पसरवेल हे सांगणे कठीण आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

चार महिन्यांतील रुग्ण, मृत्यू संख्या...महिना - शहर - ग्रामीणमार्च २४,१८८- ८,१२५एप्रिल- २१,२९५- २०,२३३मे - ६,६६६ - १८,५२५जून- ८९१- २,५८५एकूण ५३,०४० -४९,४६८------------------------एकूण बाधित - १,२,५०८एकूण मृत्यू - २,१५८ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका