शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

पिकांना जीवदान मिळणार; जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून खरीप संरक्षित पाळी सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 8:12 PM

लाभक्षेत्रातील ३८६ गावातील शेतकऱ्यांना दिलासा! 

पैठण: पावसाने गेल्या  अनेक दिवसापासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी ( दि. १) दुपारी १०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सोडण्यात आला. हळूहळू विसर्गात वाढ करण्यात येणार असून २५ दिवस खरीप संरक्षित आवर्तन सुरू राहणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. खरीपासाठी पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जायकवाडी धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत असल्याने लाभक्षेत्रातील  शेतकऱ्यांनी खरीप पिके वाचवण्यासाठी जायकवाडी धरणाच्या कालव्यातून पाणी सोडा अशी मागणी केली होती. दरम्यान पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खरीप हंगामासाठी पाणीपाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

या निर्णयानुसार शुक्रवारी डाव्या कालव्यातून दुपारी दोन वाजता १०० क्युसेक्सने विसर्ग प्रारंभ करण्यात आला. विसर्ग हळूहळू वाढवून १००० क्युसेक्स पर्यंत करण्यात येणार आहे.  पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावातील १८३३२२ हेक्टर क्षेत्रातील खरिप पिकांना पाण्याची  गरज होती, धरणातून आवर्तन मिळालज नसते तर पिके हातातून जाण्याची धोकादायक परिस्थिती उदभवली होती.

धरणात सध्या ३३%  जलसाठा उपलब्ध असल्याने खरिप पिका साठी एक आवर्तन सोडण्यात यावे अशी जोरदार  मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती.  डावा कालव्यावर १४१६४० हे. सिंचन जायकवाडी धरणाच्या २०८ कि मी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १४१६४० हे. क्षेत्र सिंचना खाली येते यात औरंगाबाद - ७६२० हे,  जालना - ३६५८० हे,  परभणी - ९७४४० हेक्टर क्षेत्र येते या क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली असून पावसाने दडी मारल्याने पाण्या अभावी पिके धोक्यात आली आहेत. 

उजव्या कालव्यातूनही पाणी सोडाउजव्या कालव्यावर ४१६८२ हे क्षेत्र सिंचनाखाली येते. जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि मी लांबीचा  आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यात औरंगाबाद - १४३२ हे,  बीड - ३७९६० हे, व अहमदनगर - २२९० हे क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे या पिकांनाही  पाण्याची गरज आहे यामुळे उजव्या कालव्यातून पाणी सोडा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

पैठण तालुक्यातील ९०५२ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांना फायदा....पैठण तालुक्यात डाव्या कालव्यावर ७६२० हे क्षेत्र व उजव्या कालव्यावर १४३२ हे. क्षेत्रातील २८  गावात खरिपाची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे पावसाने दडी मारल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खेर्डा प्रकल्पासहीत आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडा. तालुक्यातील खेर्डा प्रकल्प कोरडा पडला आहे. ब्रम्हगव्हान सिंचन योजनेतून खेर्डा प्रकल्पात पाणी सोडावे तसेच आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण