शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

मराठवाड्यातील धरणे आटू लागली; उन्हाळ्यात पाणी टंचाईची दाहकता वाढणार

By बापू सोळुंके | Published: February 12, 2024 4:05 PM

छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण येथील एमआयडीसी आणि या शहरांतील जलयोजना याच प्रकल्पावर आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडीसह दहा मोठे प्रकल्प, ७६ मध्यम प्रकल्प आणि ७५० लघू धरणांतील साठा झपाट्याने घटत असून अर्ध्याहून अधिक लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची दाहकता वाढणार आहे.

गतवर्षी मराठवाड्यात अत्यल्प आणि रिमझिम पाऊस पडला. यामुळे खरीप पिकांचे उत्पादन ४० टक्क्यांहून कमी झाले आहे, असा अहवालच कृषी विभागाने शासनास पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. गतवर्षी मुसळधार पावसाअभावी नदी-नाल्यांना पूर गेला नाही. परिणामी मराठवाड्यातील नांदेड जिल्हा वगळता अन्य धरणांतील जलसाठा वाढला नाही. मराठवाड्यातील जनतेला जनआंदोलन उभारून नाशिक आणि नगरकरांनी अडवून धरलेले ८ टीएमसी पाणी मिळवावे लागले होते. त्यामुळे आज जायकवाडी प्रकल्पात केवळ ३४ टक्के जलसाठा उरला आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण येथील एमआयडीसी आणि या शहरांतील जलयोजना याच प्रकल्पावर आहेत. यासोबतच जवळपास ४०हून अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी धरणावरच अवलंबून आहेत.

मराठवाड्यातील ७६ मध्यम प्रकल्पांत आज केवळ १८ टक्के जलसाठा उरला आहे. यातील ३७ मध्यम प्रकल्पांत आजचा जलसाठा ९ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातील निम्म्याहून अधिक धरणे कोरडी पडलेली आहेत. उर्वरित धरणांतील जलसाठाही येत्या दोन महिन्यांत तळ गाठण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील ३०६ गावे तहानलेलीमराठवाड्यातील ग्रामीण भागात जलस्रोत आटल्याने आजच्या दिवशी ३६५ गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे महसूल प्रशासनाने खासगी आणि सरकारी अशा २७८ टँकर्सद्वारे या गावांना पाणीपुरवठा सुरू केला. विभागातील विविध जिल्ह्यांत २१८ गावांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.

पाण्याचा वापर काटकसरीने करामराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पासह अन्य मध्यम आणि लघू प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. आगामी चार महिने कडक उन्हाळ्याचे आहेत. यामुळे या कालावधीत पाण्याची मागणी वाढणार आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आजपासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा.- जयंत गवळी, मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण