शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

मराठवाड्यातील धरणांनी गाठला तळ; जायकवाडी प्रकल्पात उरला फक्त ६ टक्के जलसाठा

By बापू सोळुंके | Updated: May 18, 2024 19:22 IST

चिंता वाढली! जुलैपर्यंतच पुरेल एवढाच जलसाठा जायकवाडीत शिल्लक

छत्रपती संभाजीनगर: पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाची आता सन २०१८ सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी प्रकल्पात आज केवळ ६ टक्के जलसाठा उरला आहे. जुलैपर्यंतच पुरेल एवढाच जलसाठा जायकवाडीत शिल्लक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पैठण येथील जायकवाडी धरण ओळखले जाते. जायकवाडी प्रकल्पावरच छत्रपती संभाजीनगर, जालना शहराची तहान भागविली जाते. यासोबतच या दोन्ही जिल्ह्यातील एमआयडीसी आणि साखरकारखानेही जायकवाडी प्रकल्पावर चालतात. अशा या महत्वपूर्ण प्रकल्पात आज केवळ ६ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. गतवर्षी मराठवाड्यासह जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातही कमी पाऊस पडला होता. यामुळे गतवर्षी जायकवाडी प्रकल्पात ५२ टक्के जलसंचय झाला होता. यासोबतच वाढत्या उन्हामुळे या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पिभवन होण्याचे प्रमाणही वाढल्याने धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज या प्रकल्पात असलेला जलसाठा जुलैअखेरपर्यंतच पुरेल इतकाच आहे. अशीच परिस्थिती सन २०१८ मध्ये उदभवली होती. १८ मे २०१८ रोजी या प्रकल्पात उणे ५ टक्के जलसाठा होता. याविषयी जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव म्हणाले की, जायकवाडी प्रकल्पात आज ६ टक्के जिवंत जलसाठा आहे. असे असले . विद्यमान पाण्याचा वापर लक्षात घेता हा जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरू शकतो. हा साठा संपल्यानंतरही आपण मृत साठ्यातील पाण्याचा वापर करू शकतो. यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही.

मराठवाड्यातील अन्य प्रकल्पही तळालाजायकवाडीशिवाय मराठवाड्यात अन्य १० मोठे प्रकल्प आहेत. यातील माजलगाव, सिद्धेश्वर,निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव या मोठ्या धरणाचा जिवंत जलसाठा शून्यावर आला आहे. तर बीडमधील मांजरा आणि परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात केवळ १ टक्के जिवंत पाणीसाठा उरला आहे. उर्वरित प्रकल्पापैकी येलदरीमध्ये २९ टक्के, उर्ध्व पेनगंगा ३६ टक्के, निम्न मनार प्रकल्पात २५ टक्के, विष्णूपुरी २६ टक्के जलसाठा आज शिल्लक आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी