शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

आत्याच्या घरी मृत्यू, परस्पर दफनविधी; ६ दिवसांनी कब्रस्तानमधून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला

By सुमित डोळे | Published: November 24, 2023 3:26 PM

शरीरावर खोल, गंभीर जखमांमुळे गूढ वाढले, कुटुंबालाही हत्येचा दाट संशय

छत्रपती संभाजीनगर : नारेगावच्या १९ वर्षीय सालेह फरहान हिलाबी ऊर्फ शहजाद याचा घनसावंगीच्या आत्याच्या घरी १७ नोव्हेंबर रोजी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांना कुठलीही माहिती न देताच नातेवाइकांनी त्याचा मृतदेह शहरात आणून जिन्सीतील कब्रस्तानात पहाटेच परस्पर दफन केला. मात्र, कुटुंबाने पुन्हा त्याच्या हत्येचा संशय व्यक्त केला आणि अखेर सातव्या दिवशी गुरुवारी सालेहचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा वर काढण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, सालेहच्या शरीरावर गंभीर व खोल जखमा आढळल्याने ही हत्याच असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आई, वडील, दोन भावांसह सालेह नारेगावात राहतो. खासगी काम करून त्याचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. १४ नोव्हेंबर रोजी सालेह घनसावंगीच्या देवनगरीत राहणाऱ्या आत्याकडे गेला होता. येथून जालना व घनसावंगीला पोहोचेपर्यंत तो सातत्याने वडिलांच्या संपर्कात होता. १७ नोव्हेंबर रोजी मात्र रात्री ८:३० वाजता अचानक त्याच्या वडिलांना नातेवाइकांनी कॉल करून सालेहने आत्महत्या केल्याचे कळवले. घटनेने घाबरलेल्या वडिलांना त्यांनी पुन्हा कॉल करून मृतदेह शहरातच घेऊन येत असल्याचे सांगून रात्री १२ वाजताच ते मृतदेह घेऊन नारेगावमध्ये दाखल झाले होते.

पहाटे दफनविधी, मात्र कोणालाच माहिती नाहीकाही तास घरी सालेहचा मृतदेह ठेवून नातेवाइकांनी जिन्सीच्या गंजे शहिदा कब्रस्तानात पहाटे ३:३० वाजता परस्पर दफनविधी केला. वडिलांना मात्र मुलाच्या मृत्यूविषयीची रुखरूख सल देत होती. त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. पहिले घनसावंगी पोलिसांकडे मुलाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर जिन्सी पोलिसांकडे अर्ज केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी यात तपासाची चक्रे फिरवली.

सहा दिवसांनी पुन्हा मृतदेह बाहेर काढलागुरुवारी सकाळीच १० वाजता महसूलचे वरिष्ठ अधिकारी, घाटीचे डॉक्टर, फॉरेन्सिकचे पथक, जिन्सीचे निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक रावसाहेब काकड यांच्यासह घनसावंगी पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. कायदेशीर पंचनामा करून व्हिडीओग्राफरच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. दुर्गंध पसरू नये, यासाठी घाटीच्या पथकाने रसायनाचा वापर केला. त्यानंतर २.३० वाजता मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हत्याच, त्या खोल जखमा कशाच्या ?सूत्रांच्या माहितीनुसार, आत्याच्या कुटुंबाने जरी आत्महत्या सांगितले असले, तरी तपासात सालेहच्या कपाळासह अन्य शरीरावर खोल जखमा आढळल्या आहेत. त्या कशाच्या आहेत, हे अद्याप अस्पष्ट असले तरी नातेवाईकांच्या दाव्यानुसार सालेहचा मृत्यू झालेल्या ठिकाणी रक्त देखील आढळले हाेते. त्यामुळे सालेहच्या हत्याच्याच दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. घनसावंगी पोलिसांशी वारंवार संपर्क करूनही मात्र घटनेतले तथ्य कळू शकले नाही.

हे प्रश्न अनुत्तरितच-सालेहची आत्महत्या झाल्याचे वडिलांना कळवण्यात आले. मात्र, स्थानिक पाेलिसांना न कळवताच परस्पर मृतदेह शहरात का आणला ?-नारेगावला कुटुंबाच्या घरी काही वेळच मृतदेह ठेवून पहाटेच दफनविधी का केला ?-सालेहच्या अंगावर जखमा होत्या तरी कुटुंबातील कोणत्याच सदस्याने आक्षेप का घेतला नाही? शहरातही स्थानिक पोलिसांना घटनेविषयी का कळवले नाही ?-सालेहचा मृतदेह नारेगावला आणल्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे जाळण्याचा किंवा फेकून देण्याचा सल्ला काहींनी का दिला ?

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद