शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

मरण देता का मरण...राज्यपालांकडे इच्छा मागणी

By admin | Published: May 16, 2014 12:23 AM

लालखाँ पठाण , गंगापूर सेवानिवृत्तीनंतर अर्धांगवायू आणि कर्करोग झालेल्या एका कर्मचार्‍यास जि. प. प्रशासनाकडून दोन वर्षानंतरही निवृत्तीवेतन मंजूर झालेले नाही.

 लालखाँ पठाण , गंगापूर सेवानिवृत्तीनंतर अर्धांगवायू आणि कर्करोग झालेल्या एका कर्मचार्‍यास जि. प. प्रशासनाकडून दोन वर्षानंतरही निवृत्तीवेतन मंजूर झालेले नाही. जि. प. प्रशासनाच्या या अमानवी धोरणाला कंटाळून येथील वामन विश्वनाथ जाधव या सेवानिवृत्त कर्मचार्‍याने राज्यपालांकडे इच्छामरणास परवानगी द्यावी असा अर्ज सादर केला आहे. गंगापूर येथील वामन जाधव यांची ही करुण कहाणी असून एक वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायू व तद्नंतर लगेच कर्करोगाने ग्रासलेले आहे. १९७८ मध्ये ते प्रथम लघुपाटबंधारे विभाग, गंगापूर येथे हजेरी सहायक म्हणून रुजू झाले होते. यानंतर त्यांनी पैठण, औरंगाबाद, फर्दापूर, पंचायत समिती गंगापूर, खुलताबाद आदी ठिकाणी विविध पदांवर कर्तव्य बजावले. शेवटी ३० नोव्हेंबर २०११ रोजी कन्नड तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्य करत असताना ते सेवानिवृत्त झाले. दरम्यान, याच काळात खुलताबाद येथून वडनेर येथे हजर होण्यासाठी जात असताना त्यांच्या जवळील सेवापुस्तिका प्रवासामध्ये गहाळ झाली. त्यांनी सेवापुस्तिका शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यांना सेवापुस्तिका मिळाली नाही. या बाबत त्यांनी वरिष्ठांना कल्पनादेखील दिली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांची पेन्शन योजना मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला; मात्र संबंधित विभागाने नियमाने आपले काम करू असे सांगून त्यांची बोळवण केली. कार्यालयाच्या चकरा मारता-मारता त्यांचा जीव मेटाकुटीस आला. शिवाय दैनंदिन खर्च भागविण्यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असतानाच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. अर्धांगवायूचे उपचार सुरू असतानाच कर्करोग झाला असल्याचा उलगडा झाला. असाध्य रोगाची लागण झाल्याने त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. निदान होण्यासाठी महागडे रुग्णालय व महागड्या औषधीसाठी त्यांनी आपली सर्व जमापुंजी लावली, आता उसनवार करून उपचार सुरू आहेत. सेवापुस्तिका हरवल्याने नवीन सेवापुस्तिका मिळावी यासाठी त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करून मागणी केली होती; परंतु वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर यांनी अद्याप त्यांचा अहवाल कार्यालयात सादर सेवा केला नसल्याने त्यांना नवीन सेवापुस्तिकाही मिळू शकली नाही. याबाबत वामन जाधव यांच्या पत्नी आशाबाई जाधव यांनीदेखील जिल्हा परिषद प्रशासनाला चरितार्थ चालविण्यास कुठल्याच प्रकारचे साधन नसून पती दुर्धर आजाराने ग्रासल्याने कुटुंबाला पोसणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निवृत्तीवेतन मिळाले तर आमचे कुटुंब सावरू शकेल अशा आशयाचे पत्र व आजाराबाबतचे रुग्णालयातील रिपोर्ट सादर केले होते. तरीदेखील अद्यापपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाला पाझर फुटला नाही. जाधव कुटुंबीय सध्या मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहे. वामन जाधव यांनी पेन्शन योजना, जीपीएफ व इतर बाबींची पूर्तता करून मला रक्कम अदा करण्यात यावी. सदर प्रकरणी एक महिना धीर धरून मी प्रशासनाची वाट पाहणार असून महिनाभरात प्रशासनाने कुठलीच हालचाल केली नाही, तर मी १५ जून रोजी कुटुंबियांचा निरोप घेऊन अज्ञातस्थळी जाऊन मृत्यूला कवटाळणार आहे, अशा प्रकारचे पत्र राज्यपाल, अण्णा हजारे, मानवी हक्क आयोग, लोकपाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले आहे. जाधव यांनी तर आता सर्व प्रकाराला कंटाळून ‘इच्छामरणाची’ परवानगी मागून आपली जीवनयात्रा संपविण्याचा विचार केला आहे. सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे उलटली तरी जिल्हा परिषद प्रशासन आपल्या कर्मचार्‍यांची बाजू ऐकू न घेत नसेल तर ती नोकरी काय कामाची, आयुष्यभर मरमर करून त्याचे फळ असे मिळत असेल तर अशा प्रशासनाचा धिक्कार, असे म्हणत जाधव यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहून ते ओक्साबोक्सी रडत होते.