शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मरणाने केली सुटका पण... धगधगत्या चितेला अचानक आलेल्या पुराने वेढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 14:38 IST

कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील अंजना नदीच्या पात्रात धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले.

नाचनवेल (औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील एका महिलेचे निधन झाल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नदी पात्रातील उंच जागेवर अंत्यसंस्कार केले; परंतु काही वेळातच नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढल्याची घटना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

नाचनवेल येथून जवळच असलेल्या आमदाबाद येथे स्वतंत्र अशी स्मशानभूमी विकसित केलेली नाही. गावाशेजारी असलेल्या अंजना नदीच्या पात्रालगतच मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. दोन वर्षांपूर्वी अंजना नदीला आलेल्या पुरामुळे या नदीलगतचा ग्रामस्थांना जाण्याचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे सध्या या भागात झालेल्या पावसामुळे नदीपात्र परिसरात सर्वत्र पाणी साचले आहे. या गावाला दोन महिन्यांपूर्वी स्मशानभूमी विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु सध्या पावसाळा असल्याने काम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर या गावातील शांताबाई गोटीराम बनकर (वय ८५ वर्षे) यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता नातेवाईक व ग्रामस्थांनी पाण्यातून जात अंजना नदीमध्ये उंच जागेवर अंत्यसंस्कार केले. चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली. त्यानंतर काही क्षणातच धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढली. मात्र मोठ्या शर्थीने नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने मृतदेह जळाला.

वरील भागात पाऊस झाल्याने वाढली पाणी पातळीआमदाबाद येथील अंजना नदीच्या वरील भागात असलेल्या बिलदरी, कोळंबी, भारंबा आदी गावांच्या परिसरात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अंजना नदीच्या पाणी पातळीत बुधवारी सकाळी वाढ झाली. शिवाय आमदाबाद गावाशेजारी या नदीवर कोल्हापुरी बंधारा असल्यानेही नदीपात्रात पाणी तुंबते. याचा फटका अंत्यसंस्कारासाठी आलेल्या ग्रामस्थांना बसतो.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादriverनदी