शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

विठूनामाच्या गजरात संत एकनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:38 IST

वारकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य पथक, तीन पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले आहेत.

पैठण (औरंगाबाद) : भानुदास एकनाथ असा जयघोष करत टाळमृदंगाच्या गजरात सायंकाळच्या (६.३५ वा.) सुमारास गुरुवारी शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पादुका असलेली पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी पालखीस निरोप देण्यासाठी गागाभट चौकातील पालखी ओटा परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. १९ दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी पंढरपूर येथे पोहचणार आहे. 

पालखी संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरातून मार्गस्थ होताच ठिकठिकाणी भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. मराठवाडा, खान्देश भागातील वारकरी पंढरपूर आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोबत मोठ्या संख्येने जातात. यामुळे रविवार दुपारपासून विविध वाहनाने जालना, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जळगाव आदी भागातील वारकरी पैठण शहरात दाखल झाले होते. शहरातील विविध मठात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.  

आज दुपारी बारा वाजता पालखीप्रमुख रघुनाथ बुवा गोसावी हे शेकडो वारकऱ्यांसह शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेण्यासाठी गावातील नाथवाड्यात दाखल झाले. यावेळी टाळ मृदगांच्या निनादात, धन्य आज दिन संत दर्शनाचा हा अभंग घेण्यात आला. पादुका पालखीत ठेऊन पालखी पंरपरेनुसार गावातील मंदीरातून संत एकनाथ महाराज यांचा जयघोष करत बाहेरील नाथ समाधी मंदीरात गेली. तेथे भाविकांनी भक्ती भावाने समाधी दर्शन घेऊन पालखी भाविकांच्या दर्शनासाठी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर ठेवण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर पालखी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.

पालखीस निरोप देण्यासाठी  माजी आमदार चंद्रकांत घोडके, विलास भुमरे, नंदलाल काळे, सुरज लोळगे, शेखर शिंदे, सुचित्रा जोशी, नीता परदेशी,  चंद्रशेखर पाटील, सोमनाथ परदेशी, निमेश पटेल,  ,  रेखाताई कुलकर्णी, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे,   पवन लोहीया, संजय कोरडे, शिवा पारवे,  प्रा संतोष गव्हाणे, शाम लोहिया , दिलीप मगर , ,रघुनाथ ईच्छैया, शिवा पारिख, सोमनाथ परळकर,   सोमनाथ भारतवाले, भिकाजी आठवले , दत्ता फासाटे,  , अनिल घोडके,  तुषार पाटील, सुनिल रासणे,  दिनेश पारिख , विजय चाटुपळे ,महेश जोशी ,बजरंग लिंबोरे ,उमेश पंडुरे, राजू टेकाळे , भूषण कावसानकर, कृष्णा मापारी, ईश्वर दगडे, संतोष सव्वासे, अश्विनी लखमले,  कांचन लेंभे, सचिन ज्योतिक, संतोष धापटे, विजय चाटुपळे, सतिश आहेर, संभाजी सव्वाशे, पंकज चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.  पालखीस निरोप देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, पोलीस उपअधिक्षक विशाल नेहूल, पोलीस निरीक्षक किशोर पवार, तहसीलदार दत्ता निलावाड,  नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, आदीसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

वारकऱ्या प्रती सेवाभाव...संत एकनाथ महाराज दिंडीत सहभागी वारकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य पथक, तीन पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले आहेत.  जि.प. माजी सभापती विलास भुमरे यांच्यातर्फे साहित्य ठेवण्यासाठी वारकऱ्यांना रेक्झीन बैग वितरीत करण्यात आल्या. वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी रेनकोटचे वाटपही करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते शाम लोहिया यांच्या वतीने दिंडी मार्गावर वारकऱ्यांसाठी मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक संस्थानी पुढाकार घेतल्याचे आज दिसून आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAshadhi Ekadashiआषाढी एकादशी