शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मागासवर्गीयांच्या २०५२ वस्त्यांमध्ये ३४६ कोटींची विकासकामे प्रस्तावित, बहृत आराखड्यावर अखेर शिक्कामोर्तब

By विजय सरवदे | Updated: February 29, 2024 18:44 IST

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास ही योजना राबविली जाते

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासासाठी आगामी पाच वर्षांच्या बृहत आराखड्यावर अखेर समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त व जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्कामोर्तब केले. या योजनेअंतर्गत आगामी पाच वर्षांत जिल्ह्यातील २०५२ वस्त्यांमध्ये ३४६ कोटींची विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास ही योजना राबविली जाते. यासाठी सन २०२३-२४ ते २०२७-२८ या पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करण्याची प्रक्रिया जुनपासून सुरू झाली होती. बारीक सारीक बारकावे दुरूस्त केल्यानंतर आता कुठे या आराखड्यास अंतिम मान्यता मिळाली. आराखड्यात मागील पाच वर्षांच्या काळात या घटकांची लोकसंख्या वाढ, नवीन वस्त्या, आतापर्यंत राबविण्यात आलेली कामे, खर्च झालेला निधी, यापुढील पाच वर्षांत प्राधान्याने कोणती विकासकामे अपेक्षित आहेत, या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.

चेहरामोहरा बदलणारया आराखड्यात पुढील पाच वर्षांत मागासवर्गीय वस्तींमधील विविध कामांसाठी सुमारे ३४६ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या हद्दीतील २ हजार ५२ मागासवर्गीय वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार आहे.

कोणती कामे प्रस्तावितजिल्ह्यातील ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पाच वर्षात समाजमंदिर, अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते, पाणीपुरवठा, अंतर्गत गटारी, पेव्हर ब्लॉक, मलनिःसारण, पथदिवे आदी विकासकामे प्रस्तावित आहेत. ग्रामपंचायतींनी वर्षनिहाय कोणती कामे करायची, त्याचा प्राधान्यक्रम ग्रामसभेत निश्चित केला आहे.

राज्यात पहिलाच प्रयोगया योजनेंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांएवेजी प्राप्त निधीतून दुसऱ्याच ठिकाणी कामे केल्याच्या तक्रारी होत्या. यापुढे याच वस्त्यांमध्ये ही कामे राबविण्यात यावीत, यासाठी संपूर्ण २०५२ वस्त्यांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्यात आले आहे. राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग झाल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांनी सांगितले.

वाढीव निधीनुसार आराखडाजि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी सांगितले की, आता या योजनेंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विकासकामांवर पूर्वीपेक्षा दुप्पट निधी खर्च करण्याचा शासननिर्णय आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी दुप्पट निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी ६० कोटींचा निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद