शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:49 IST

तब्बल दीड तासानंतर दुसरे इंजिन झाले रवाना

ठळक मुद्देमनमाड- काचीगुडा पॅसेंजर गाडीला चिखलठाणा रेल्वे स्टेशन येथे थांबविण्यात आले दुपारी १२ च्या दरम्यान दुसरे इंजिन रवाना करण्यात आले

बदनापूर/औरंगाबाद : बदनापूरहुन औरंगाबादकडे जाणाऱ्या धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन करमाड येथे अचानक बंद पडले.  सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान अचानक मोठा आवाज होऊन हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन बंद पडले. यामुळे सुमारे दोन तास प्रवास्यांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेस बंद पडल्याने मनमाड- काचीगुडा पॅसेंजर गाडीला चिखलठाणा रेल्वे स्टेशन येथे थांबवून ठेवण्यात आली.

सकाळी साडेनऊ ला बदनापूरहुन मनमाडकडे जाणारी हायकोर्ट एक्सप्रेस आज करमाडजवळ गेल्यानंतर तिचे इंजिन अचानक फेल झाले त्यामुळे हजारो प्रवासी मधेच अडकले. त्यानंतर औरंगाबादहून मनमाड-काचीगुडा ही रेल्वे बदनापूरकडे जात असताना तिला चिकलठाणा येथे थांबविण्यात आले. या गाडीचे इंजिन करमाडकडे हायकोर्टसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे मनमाड काचीगुडा या पॅसेंजर रेल्वेतील प्रवाशीही चिकलठाणा रेल्वे स्थानकावर तासनतास अडकले. सुमारे बारा वाजेच्या सुमारास हायकोर्ट एक्सप्रेस चिकलठाणा येथे आली होती. मात्र दोन तास ताटकळल्याने या दोन्ही रेल्वेतील हजारो रेल्वे प्रवाशांची मोठी दयनीय अवस्था झाली होती. 

मनमाड-काचीगुडा या रेल्वेतील अनेक प्रवासी बारा वाजेच्या सुमारास आलेल्या सचखंड एक्सप्रेसमध्ये बसुन पुढील प्रवासासाठी निघाले. मात्र मनमाड काचीगुडा हि रेल्वे चिकलठाणा स्थानकावरच उभी होती. या पॅसेंजरमधून प्रवास करणारे दिपक मुंडलीक म्हणाले की, रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभारामुळे प्रवास्यांचे हाल झाले. ही पॅसेंजर चिकलठाणामध्ये  उभी करण्यापेक्षा करमाडपर्यंत आणली असती तर प्रवास्यांना पुढे अन्य वाहनांनी जाता आले असते त्यांचा वेळही वाचला असता.

मनमाड- काचीगुडा पॅसेंजरसाठी जालन्याहून इंजिन रेल्वे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, करमाडजवळ  धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान अचानक बंद पडले. या रेल्वेसाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनमाड- काचीगुडा या पॅसेंजर रेल्वेचे इंजिन पाठविण्यात आले आहे. इंजिन करमाड रेल्वे स्टेशनच्या दिशेन रवाना झाले असून या इंजिनच्या सहाय्याने धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेस औरंगाबादकडे आणण्यात येईल. या दरम्यान  मनमाड- काचीगुडा पॅसेंजर चिखलठाणा रेल्वेस्टेशनवर थांबवून ठेवली आहे. या पॅसेंजर गाडीसाठी जालना येथून दुसरे इंजिन मागविण्यात आले आहे.

दरम्यान, इंजीनन काढल्याने मनमाड-काचीगुडा पॅसेंजर रेल्वेतील प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस चिखलठाणा येथे अडवून ठेवली.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन