शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिष्यवृत्तीचा अर्ज भरला का; पोर्टल सुरू झाले, ३० नोव्हेंबरपर्यंत आहे मुदत

By विजय सरवदे | Updated: October 13, 2023 19:20 IST

घरी बसून सुद्धा विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात

छत्रपती संभाजीनगर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता महाडीबीटी पोर्टल सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी अर्जांची पडताळणी करुन परिपूर्ण अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करायचे आहेत.

यासंदर्भात समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी कळविले की, दरवर्षाप्रमाणे २०२३- २४ या चालू शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन आणि नूतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत असून त्यासाठी ११ ऑक्टोबरपासून हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना व इतर शुल्क विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे. या शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज भरावेत. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून अर्जदार विद्यार्थी घरी बसून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने अर्ज भरु शकतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची पडताळणी महाविद्यालयांनी विहित कालावधीत करावी व त्रुटींची पुर्तता करून घेणे बंधनकारक आहे. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणी शिष्यवृत्तीपासून वंचीत राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर राहिल, असे समाज कल्याण विभागाने कळविले आहे.

गत वर्षी ६७ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभगेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ३० हजार १०१ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, तर विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील १५३ विद्यार्थी अशा एकूण ६७ हजार २५४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यात आली.

अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रेशिष्यवृत्ती अर्जासोबत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्न प्रमाणपत्र, मागील वर्षाची गुणपत्रिका आदी कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण