शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक विसर्ग; आवक वाढल्याने १८ दरवाजे दोन फुटांनी उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:40 IST

गोदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

ठळक मुद्देविसर्ग वाढल्याने जायकवाडी धरणाखालील पूल पाण्याखाली गेलाधरणाकडे जाणारे रस्ते पोलिसांकडून बंद 

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणातून रात्री ३७,७२८ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. रात्री ८ ते ८.३० वाजेदरम्यान धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी वर उचलण्यात आले. यात धरणाखालील पूल पाण्याखाली गेला असून, दक्षिण जायकवाडीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान, गोदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

रविवारी दुपारपर्यंत धरणातून २५,१५२ क्युसेक विसर्ग जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजांतून सुरू होता, तर धरणामध्ये २१,४४२ क्युसेक आवक होत होती. आवक व विसर्ग, असा असताना धरणाचा जलसाठा ९९.४४ टक्के कायम होता. मात्र, दुपारनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रात्री धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी वर उचलून धरणातून १२,५७६ क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे धरणातून ३७,७२८ क्युसेक विसर्ग सुरू होता. गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू झाल्याने धरणाखालील पूल पाण्याखाली गेला होता.  धरण काठोकाठ भरत आले असताना येणारे पाणी सामावून घेण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून, धरणाचा जलसाठा ९८.४० टक्के इतका कमी करण्यात येईल, असे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. 

रविवारी सायंकाळी नाथसागराची  पाणीपातळी १,५२१.९० फुटांपर्यंत, तर ४६३.८७५ मीटरमध्ये झाली होती. धरणात आवक  २१,४४२ क्युसेक होत होती. धरणाचा एकूण जलसाठा २,८९७.१०० दलघमी, तर जिवंत पाणीसाठा २,१५८.९९४ दलघमी झालेला आहे. धरणाची टक्केवारी ९९.४४ टक्के झाली असून, उजव्या कालव्यातून   ६०० क्युसेक व डाव्या कालव्यातून १,५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे, असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले. आवक लक्षात घेता धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते, असे राजेंद्र काळे म्हणाले.

धरणाकडे जाणारे रस्ते पोलिसांकडून बंद जायकवाडी धरणाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून, तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धरण परिसरात पायी जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर पर्यटकांची गर्दी होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी