शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

तिकडे जन्मस्थळावरून वाद; इकडे मुस्लिमांनी पुढाकार घेत हनुमान मंदिराचा केला जीर्णोद्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 12:29 PM

हिंदू उंबरठा नसलेल्या मुस्लीम बहुल नारायणपूरचा आदर्श, स्वखर्चाने गावातील हनुमान मंदिराचा केला जीर्णोद्धार

- महेमूद शेख

वाळूज महानगर (औरंगाबाद) : गावात एकही हिंदू उंबरठा नसलेल्या मुस्लीम बहुल नारायणपूरच्या ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. बुधवारी (दि.१) गावात साधू-संतांच्या उपस्थितीत हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

सध्या देशात मंदिर-मस्जिदवरून ठिकठिकाणी भांडणाच्या घटना घडत असून, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्यामुळे एकता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असतानाही ग्रामीण भागात हिंदू-मुस्लीम समाज आजही एकोप्याने राहत आहे. वाळूजपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूरची लोकसंख्या ३५०० हजारांच्या आसपास आहे. या गावात मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास २८००, दलित समाजाची ४००, गोसावी समाजाची ३०० एवढी असून गावात दोन शीख कुटुंबीयाचेही वास्तव्य आहे.

विशेष म्हणजे, या मुस्लीम बहुल गावात एकही हिंदू वास्तव्यास नाहीत. गावात हनुमान मंदिराची आजघडीला पूर्णपणे पडझड झाल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय सरपंच नासेर पटेल यांनी घेत मित्र-मंडळी व ग्रामस्थांची मते जाणून घेतली. हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सर्वांनी सहमती दर्शविल्यानंतर सरपंच नासेर पटेल व केसापुरीचे काकासाहेब फांदाडे यांच्या पुढाकाराने फेब्रुवारी महिन्यात जीर्णोद्धाराचे काम सुरू केले व ते आता पूर्ण झाले आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उपसरपंच मजीद पटेल, ग्रामविकास अधिकारी ए.आर. राठोड, सब्जर पटेल, अय्युब पठाण, लाल पटेल, दर्शनसिंग संधू, संजय घाडगे, दीपक खरात, हाशम पटेल आदीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

आज हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठानारायणपुरात जीर्णोद्धार करण्यात आलेल्या हनुमान मंदिरात उद्या बुधवार (दि.१) सकाळी १० वाजता पुजारी नंदू गुरुजी वाळूजकर यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता ह.भ.प.विठ्ठल महाराज शास्त्री यांचे कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच नासेर पटेल, काकासाहेब फांदाडे व ग्रामस्थांनी केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक