शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

वीस गावांच्या पाणीपुरवठा योजनांची वीज केली खंडित

By admin | Published: January 15, 2017 11:20 PM

जालना/वडीगोद्री :वडीगोद्री परिसरातील वीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा पुरवठा खंडित केल्याने गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

जालना/वडीगोद्री : महावितरण कंपनीने थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. शहर परिसरातील वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान वडीगोद्री परिसरातील वीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा पुरवठा खंडित केल्याने गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. वडीगोद्री परिसरात थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण राबवित आहे. याचा ‘झटका’ वीस गावांच्या पाणी योजनांनाही बसला आहे. वडीगोद्री परिसरातील वीज बिल थकीत असलेल्या पाणीपुरवठा योजनांचेही वीज तोडण्यात आल्यामुळे येथील ग्रामस्थांना भर हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या थकीत बिलाचा आकडा ३० लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे गतवर्षीपासून वीज बील न भरणाऱ्या ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात येत आहे. या अंतर्गत शनिवारी दिवसभर वडीगोद्री परिसरातील २० गावांचा पाणीपुरवठा करणाऱ्या वीजपंपांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. रविवारी सुटीमुळे ही मोहीम बंद ठेवली असली तरी सोमवारपासून उर्वरित गावांत मोहीम तीव्र करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत काही प्रमाणात का होईना वीज बिलांचा भरणा करीत होती. मात्र, मागील वर्षीपासून अनेक ग्रामपंचयातींनी वीज बिल भरणाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे वसुलीचे प्रमाण घटले आहे. यासोबतच थकबाकीत असलेले व्यावसाईक, औद्योगिक तसेच सरकारी कार्यालये घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरूध्दही ही मोहीम सुरू केली असून, ती मार्च अखेरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)