शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

डाॅक्टर, १० दिवस झाले तरी खोकला जाईना; तापमानात चढ-उताराने बालकांना आजारांचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 19:37 IST

विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे.

औरंगाबाद : सकाळी आणि रात्री थंडी, दुपारी ऊन... कधी तापमान वाढते, तर कधी घसरते, असा अनुभव गेल्या काही दिवसांपासून येत आहे. वातावरणातील अशा बदलाने बालकांना सर्दी, खोकल्याचा विळखा पडत आहे. बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या १० पैकी ८ बालके सर्दी, खोकल्याची असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे. यातही सर्दी, खोकला आला की साधारण चार ते पाच दिवसांत कमी होतो, असाच आजवरचा अनुभव आहे. मात्र, १० दिवस झाले, १५ दिवस झाले तरी चिमुकल्याचा खोकला काही जात नाही, अशा तक्रारी पालकांकडून वाढत आहेत.

बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे. दुपारी ऊन, तर सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवतो. अशा परिस्थितीत आजार बळावत आहेत. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत ओपीडीमध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. बालकांमध्ये न्यूमोनियाची कोणतीही लक्षणे दिसल्यास गांभीर्याने घेतले पाहिजे. बालकाचे आजारपण अंगावर काढता कामा नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

सर्वसाधारण खोकला चार दिवसांत बरासर्वसाधारण सर्दी, खोकला हा तीन ते चार दिवसांत बरा होतो. जास्त दिवस खोकला राहत असेल तर त्याची वेगवेगळी कारणे असतात. न्यूमोनिया, ॲलर्जी, बालदमा अशा परिस्थितीत अधिक दिवस खोकला राहतो.- डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी

सर्दी, खोकल्याचे अधिक बालरुग्णसध्या सर्दी, खोकल्याने त्रस्त बालरुग्णांची संख्या अधिक आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या दहापैकी आठ बालके ही सर्दी, खोकल्याची आहेत. ताप, सर्दी चार ते पाच दिवसांत बरी होते. परंतु, खोकला जात नसल्याचे सध्या दिसत आहे.- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद