शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'आंदोलनांची चिंता नको, कामाला लागा'; अमित शाहांचे मराठवाड्यातील ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:10 IST

कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या, अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी निवडणूक आहे. त्यामुळे एकेक जागा जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा. कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यातील किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प करा, असा कानमंत्र भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी पदाधिकारी संवाद बैठकीत दिला. तसेच प्रत्येक बूथवर दहा टक्के मते वाढवा, असे आवाहन केले.

मंगळवारी सायंकाळी एमजीएम कॅम्पसमधील रुक्मिणी सभागृहात झालेल्या मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महामंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विजया रहाटकर, माजी खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात गृहमंत्री शाह यांनी काँग्रेस, महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बघतील. मागच्यावेळी गुजरातेत ३ आंदोलने सुरू होती, तरीही आपण जिंकलो. लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्याची हीच संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

अंतर्गत गटबाजीचे वाद मिटवा....पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील गटबाजीचे भांडण मिटवा. नेत्यांना आपल्या घरी मनधरणीला येण्याची गरज पडणार नाही, असे काम करा. भाजप मागणाऱ्याला काही देत नाही, मात्र न मागणाऱ्याला देतो. प्रत्येक बूथवरील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये घेऊन या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या विजय तुमचा होईल. ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या, असा सल्ला गृहमंत्री शाह यांनी दिला.

फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल....लोकसभा निवडणुकीत असलेली नकारात्मकता आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपल्यावर विशेष नाराज होते. दुष्काळ निसर्गाचा असला तरी तो सरकारने दिलेला असतो, अशी नाराजी लोकांमध्ये असते. महिला मतदानावर फोकस करा, कारण महिला मतदारांना जात, धर्म, पंथ याच्याशी काही घेणं नसते. ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी त्या सदैव राहतात, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMahayutiमहायुतीAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस