शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ड्रेनेजच्या चेंबरमधून घुसविली पिण्याच्या पाण्याची लाईन, पाणी कसे मिळणार शुद्ध ?

By साहेबराव हिवराळे | Updated: April 18, 2024 15:54 IST

एक दिवस एक वसाहत: लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व, दत्तनगर, सद्गुरू सोसायटी, शोभानगर, श्री गणेशा, रॉयल पार्क, विमान नगरात पाण्याचा प्रश्न गंभीर

छत्रपती संभाजीनगर : ड्रेनेज चेंबरमधून पाण्याची लाईन घुसविली असल्याने सुरुवातीची दहा ते पंधरा मिनिटे पाणी वाया जाऊ द्यावे लागते. त्यानंतर पाणी भरावे लागते. जालना रोडलगत असलेला लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व, दत्तनगर, सद्गुरू सोसायटी, शोभानगर, श्री गणेशा, रॉयल पार्क, विमाननगर परिसर गजबजलेला असला तरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

कुठे रस्ते अपूर्ण तर कुठे पथदिव्यांची कमतरता आहे. परिसर जलदगतीने विस्तारत असून महानगरपालिकेकडे कर अदा करूनही सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जात आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी लोकप्रतिनिधीने दिलेले हातपंप किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहेत. घंटागाडी चालकाने दांडी मारल्यास प्रवेशद्वारावरच दुर्गंधीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. कारण तेथे कचरा जमा केलेला असतो. ड्रेनेेजच्या जुन्याच लाईन असल्याने चोकअप होण्याचे प्रकारही वाढलेले आहेत. जालना रोड ओलांडून जाताना किंवा मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना धोका असून लोखंडी जाळ्यांमुळे वाहनाचा अंदाज येत नाही, तेव्हा रस्ता ओलांडणे धोकादायक ठरते.

रेशन दुकान हवेरेशन दुकान नसल्याने चिकलठाणा गावात जावे लागते. चिकलठाणा येथे रेशन दुकानात जाऊन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा लागतो. अनेकदा उशीर झाल्यास तो मिळत नाही. शासनाने या परिसरासाठी नवीन दुकान दिले पाहिजे.- शेख मतीन, रहिवासी

आरोग्याची समस्याघाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. याविषयी मनपा आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी करूनही काम मार्गी लागले नाही. त्वरित पाणी व ड्रेनेजलाईन वेगळी करावी. लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व दत्तनगर, सद्गुरू सोसायटी श्री गणेशा रॉयल पार्क विमाननगरात दूषित पाण्याची समस्या सोडवावी.- सुरेश पवार, रहिवासी

बालवाडी, अंगणवाडी हवीमनपाने बालवाडी, अंगणवाडी व्यवस्था केलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांना खासगी शाळा परवडत नाही. नाईलाजास्तव कामगार व मध्यमवर्गीयांना मुलांना लांबच्या शाळेत टाकावे लागते. दूरवर ने-आण करणे पालकांसाठी त्रासदायक ठरते.- शेख कलीम, रहिवासी

एकाच खांबावरून जोडण्या किती?शोभानगरातील नागरिकांना प्रशस्त रस्ता म्हाडापासून सुरू असला तरी इतरत्र रस्ता बंद करण्यात आला आहे. विजेचा एकच खांब असून स्थानिक नागरिकांना वीज जोडणी घेताना लाकडी खांबाचा टेकू द्यावा लागतो. सुरळीतपणे वीज मिळावी यासाठी तिन्ही गल्ल्यांत विजेचे खांब टाकून द्यावेत. नाईलाजाने एकाच खांबावरून धोकादायक जोडणी करावी लागते.- संजय दुसाने, रहिवासी

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका