शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

‘पेयजल’वर संक्रांत !

By admin | Published: January 14, 2017 12:21 AM

बीड प्रशासकीय अनास्था व दफ्तरदिरंगाईमुळे जिल्ह्यातील ६४ गावांत प्रस्तावित मुख्यमंत्री पेयजल योजनांची अंमलबजावणी मागील आठ महिन्यांपासून रखडली आहे

संजय तिपाले  बीडप्रशासकीय अनास्था व दफ्तरदिरंगाईमुळे जिल्ह्यातील ६४ गावांत प्रस्तावित मुख्यमंत्री पेयजल योजनांची अंमलबजावणी मागील आठ महिन्यांपासून रखडली आहे. आता जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजल्याने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्या आहेत. परिणामी या योजनांवर ‘संक्रांत’ ओढावली असून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.एक हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांत ही योजना राबविण्यात येणार आहे. पूर्वी योजना न झालेल्या गावांना यात प्राधान्य आहे. २०१६-१७ या वर्षासाठी जिल्ह्यात ६४ गावांत ही योजना साकारण्यात येणार असून त्यासाठी लोकसंख्या व जलस्त्रोत ग्राह्य धरुन सुमारे ५९ कोटी १७ लाख रुपयांचा निधी दिला आहे. दरम्यान, ३१ योजनांची अंदाजपत्रके ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे शासनस्तरावर गेली आहेत. उर्वरित योजनांचे अंदाजपत्रक अद्याप जिल्हास्तरावरच आहेत. सध्या सात योजनांची अंदाजपत्रके तयार असून ते औरंगाबाद येथील जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांमार्फत राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडे जाणार आहेत. २१ योजनांच्या अंजाजपत्रकांचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित १७ योजनांचा घोळ कायम आहे. आता आचारसंहिता लागू झाल्याने आणखी ४० दिवसांपर्यंत यासंदर्भात कुठलाही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. परिणामी योजनांच्या प्रत्यक्ष अमंलबजावणीसाठी आता आणखी काही महिन्यांचा कालावधी अटळ आहे.तथापि, सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे जिल्ह्याला टंचाईचा सामना करावा लागला होता. गतवर्षी १ हजारांहून अधिक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवावे लागले होते. मुख्यमंत्री पेयजल योजनेमुळे संबंधित गावांतील जलसंकट दूर होणार आहे. त्यामुळे या योजनांची तातडीने अंमलबजावणी अपेक्षित आहे.