शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

दुष्काळातही वसुलीचा तगादा

By admin | Published: January 02, 2015 12:30 AM

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जितराब जगविण्याचे मोठे आव्हाण बळीराजाच्या पुढे उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे.

 व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जितराब जगविण्याचे मोठे आव्हाण बळीराजाच्या पुढे उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. त्याच मायबाप सरकारने आता शेतसाऱ्यासाठी बळीराजाकडे तगादा लावला आहे. शेतसारा भरावयाची रक्कम जरी लहान असली तरी ती भरावीच लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात ८ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. मागील तीन वर्षापासूनच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासनाने बीड जिल्ह्यात १०० दुष्काळ असल्याचे सांगितले. यामध्ये १४०४ पैकी सर्वच गावांतील पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे. एक एक्कर क्षेत्रातील कापसाला ३० ते ४० किलो कापसाचा उतारा येत आहे. चाऱ्या अभावी शेतकऱ्यांनी जनावरे बाजारात नेहून मातीमोल किमतीत विकले आहेत. एकंदरीत अशी जिल्ह्यातील परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांकडून जमीनींचा शेतसारा भरून घेतला जात असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले. एकीकडे शासन दुष्काळी भागासाठी विविध योजना राबवित आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना साधा शेतसारा देखील माफ केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.तीन हेक्टर क्षेत्रासाठी ५००ज्या शेतकऱ्याचे तीन हेक्टर क्षेत्र असेल त्या शेतकऱ्याला पाचशे रूपयांपर्यंतची रक्कम संबंधीत तलाठी कार्यालयांकडे भरावी लागत असल्योच शिरूर कासार तालुक्यातील शेतकरी नामदेव सानप यांनी सांगितले.शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्षजिल्ह्यातील १४०४ गावांमधील पिकांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे़ यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक टंचाईत सापडला आहे़ जिल्हा प्रशासनाने दुष्काळाचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे़ शेतकऱ्यांसाठी नेमकी मदतीची रक्कम किती असेल ? हे आताच सांगणे शक्य नाही़ मात्र, १५ दिवसात मदत येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले़शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या शेतसारा वसूलीमध्ये जि. प. च्या वतीने करण्यात आलेल्या वसूलीची रक्कम ३८ लाख ३६ हजार रूपये आहे तर ग्रा. प. स्तरावर घेण्यात येणारा उपकर १ लाख ४ हजार रूपये डिसेंबर दरम्यान पर्यंत जमा झालेला असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.