शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

चालकाअभावी उपकेंद्राची बसही धूळ खात

By admin | Published: August 27, 2015 12:10 AM

हणमंत गायकवाड , लातूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून

हणमंत गायकवाड , लातूरस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबरोबर अनेक सुविधांचाही अभाव आहे़ गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या परिसरात शोभेच्या वस्तुगत पार्किंग केलेली आहे़ शिवाय, मुला-मुलींच्या वसतिगृहाचा प्रस्तावही शासनाकडे प्रलंबित आहे़ लातूर शहरापासून विद्यापीठ उपकेंद्राचे अंतर १० ते १२ किलोमिटर आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना लातूर शहरातून उपकेंद्रात जाण्यासाठी विद्यापीठाने एक बस दिली आहे़ काही दिवस या बसमधूनच विद्यार्थी उपकेंद्रात जात होते़ मात्र गेल्या एप्रिल महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या कॅम्पसमध्ये पार्किंग केलेली आहे़ लातूर बसस्थानक, गांधी चौक, रेणापूर नाका, पाण्याची टाकी, शिवाजी चौक व राजीव गांधी चौकात या बसचा थांबा होता़ या थांब्यावरुन विद्यार्थी घेतल्यानंतर बस उपकेंद्रात जात असे़ परंतू आता या बसला चालकच नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाद्वारे उपकेंद्रात जावे लागत आहे़ साध्या चालकाचा प्रश्न विद्यापीठाने गांभिर्याने घेतला नाही़ परिणामी विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे़ सध्या उपकेंद्राच्या तीन संकुलात एमबीएच्या प्रथम वर्गात ३० व द्वितीय वर्षात २०, एम़ए़अर्थशास्त्राच्या प्रथम वर्षात २३ व द्वितीय वर्षात १३, एम़ए़ समाजशास्त्राच्या प्रथम व द्वितीय वर्षाला प्रत्येकी ८, एम़एस्सी़ कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्षात २५ व द्वितीय वर्षात १४, एम़एस्सी़बायो़ प्रथम वर्षात १ व द्वितीय वर्षात २, समाजकार्य प्रथम ३६ व द्वितीय २६ असे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ प्रथम वर्षाचा आकडा अधिक असून, द्वितीय वर्षाचा आकडा प्रत्येक अभ्यासक्रमाला कमी झाला आहे़ केवळ उपकेंद्रामध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संस्थेतून काढता पाय घेतला आहे़लातूर शहराची ओळख शिक्षणाची पंढरी म्हणून देशात झाली आहे़ त्यामुळेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरला उपकेंद्र दिले़ लातूर ते नांदेडचे अंतर दीडशे किलोमिटरच्या जवळपास आहे़ वेळ व पैसा तसेच एवढे अंतर काठून किरकोळ कामासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाण्याची गरज पडू नये म्हणून उपकेंद्राची निर्मिती त्यांनी केली़ परंतू हा उद्देश प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सफल होताना दिसत नाही़ बसला साधा चालक मिळू नये हे उपकेंद्राचे मोठे दुर्दैव आहे़