शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वनविभागाच्या असहकारामुळे उन्हाळ्यातील कामे अन् वृक्षारोपणच आले धोक्यात!

By साहेबराव हिवराळे | Updated: March 29, 2024 18:52 IST

दिवस जागतिक वन दिनही आला तसा गेला: कामे सुरू होण्याची प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर: वनविभागातील कामे आता रोजगार हमीतून करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विरोध होत असून त्यांनी कामास असहकार सुरू केल्याने उन्हाळ्यात करण्यात येणारी वृक्षारोपणविषयक कामे बंद आहेत. सकारात्मक कामे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

जशी जंगले नष्ट होतात, तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात. जंगलतोडीमुळे जगातील १२-१८ टक्के कार्बन उत्सर्जन होते. जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीचे आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून खड्डा देखील खोदला नाही की वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास कुणी पुढे आलेले नाही. हंगामी मजुरांची संख्या दिसत नाही. कारण निधीच नाही तर खड्डे खोदणे आणि नर्सरीत रोपांचे संगोपन करणार कोण? अधिकारी झाडांना पाणी देणार काय? मजूरच नाही, नवीन रोपं तयार करण्यात आलेले नाही. यंदाच्या वृक्षारोपणाचा मूळ उद्देशच गोलमाल होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

स्प्रिंकलर्सला कोळ्याचे जाळेनर्सरीत यावेळी रोपांची संख्या खूप चांगल्या अवस्थेत असते, परंतु यंदा छत्रपती संभाजीनगरच्या नर्सरीत अजूनही रोपांचा उन्हाळाच दिसत आहे. उन्हाळ्यातही कमी पाण्यावर रोपं जगावी, यासाठी लावण्यात आलेल्या ठिबक संच आणि स्प्रिंकलर्सला कोळ्याचे जाळे तयार झालेले आहे. यावरून अंदाज येतो की आठ-आठ दिवस मजूरही नर्सरीत पाणी भरण्यासाठी येत नसावे, जेमतेम झाडांची संख्या शहर व परिसराच्या दृष्टीने झाडं उपलब्धच नसल्यास वृक्षारोपणाचा उद्देश कोळ्याच्या जाळ्यात अडकला आहे.

अधिकारी निवडणूक कामात..आचारसंहिता असल्याने अधिकारी निवडणूक कामात गुंतलेले असून, ते या प्रकरणावर बोलण्यास मौन बाळगत असल्याचे वन विभागाचे चित्र आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबादforest departmentवनविभाग