शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

ई-पीक पेराचे मोबाइल ॲप्लिकेशन सतत हँग; लाखो शेतकरी नोंदीपासून वंचित

By बापू सोळुंके | Published: August 21, 2024 12:16 PM

खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी

छत्रपती संभाजीनगर : नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी ई-पीक पेराची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, यावर्षी मोबाइल ॲप्लिकेशन सतत हँग व्हायचे, यामुळे सुमारे सहा लाख खातेदार शेतकऱ्यांना ई-पीक पेराची नोंद करता आली नसल्याचे समोर आले आहे.

गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले. कापूस आणि साेयाबीनची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. याविषयी ओरड झाल्यानंतर शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरपर्यंत पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षी ई-पीक पेरा ॲप्लिकेशनवर नोंदणी केली आहे, त्यांनाच हे अनुदान मिळेल. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

१५ ऑगस्टपर्यंत होती मुदतयावर्षी खरीप हंगामातील पिकांची ई नोंद करण्यासाठी १ ते १५ ऑगस्ट हा कालावधी दिला होता. ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन अत्यंत संथपणे चालणे, अनेकदा प्रयत्न करूनही यावर शेतातील उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड न होणे, अशा समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला. शिवाय सर्वच शेतकऱ्यांकडे अँड्राॅईड मोबाईल नसल्याने त्यांना ई- पीक पाहणीची ऑनलाइन नोंदणी करता आली नाही. याबाबतच्या तक्रारी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे करीत आहेत. मात्र, ई-पीक पेरा ही बाब महसूल विभागाशी संबंधित असल्याचे उत्तर दिले जाते. मात्र, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगतात.

जिल्ह्यात ११.४० लाख शेतकऱ्यांचा पीक विमायावर्षी जिल्ह्यातील ११ लाख ४० हजार खातेदार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. १ रुपयात पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर जाऊन पीक विमा घेतला. मात्र, पीक पेरा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अँड्राॅईड मोबाईलसह शेतात जाऊन उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करावे लागते. त्यावर अक्षांश, रेखांश स्पष्टपणे दिसणे आवश्यक असते. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे अँड्राॅईड मोबाइल नाही, त्यांना ही नोंदणी करता आली नाही. केवळ ५ लाख शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी नोंदणी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMobileमोबाइल