शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

शिंदेंची कृती म्हणजे शिवसैनिकांच्या मनातील खदखद; बाळासाहेबांसोबत काम केलेल्यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 6:32 PM

आयुष्यभर आपण ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबतच आज सत्ता स्थापन करणे हे कोणत्याही शिवसैनिकाला पटले नाही.

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत औरंगाबाद शहरातील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी काम केले. शिवसेनेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी त्यावेळी शिवसैनिकांमध्ये होती. काळानुसार शिवसेना बदलत गेली. आयुष्यभर आपण ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबतच आज सत्ता स्थापन करणे हे कोणत्याही शिवसैनिकाला पटले नाही. आता अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी जे पाऊल उचलले, ती प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील खदखद असल्याचे मत बाळासाहेबांच्या काळातील शिवसैनिकांनी व्यक्त केले.

काँग्रेससोबत जाणे हेच चुकलेशिवसेनेच्या स्थापनेपूर्वीपासून मी काम करीत होतो. पहिला जिल्हाप्रमुख म्हणून काम केले. २०० पेक्षा जास्त केसेस माझ्यावर झाल्या. आयुष्यभर प्रस्थापित काँग्रेसशी लढलो. नंतर राष्ट्रवादीसोबत लढाई केली. अचानक सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हे कोणत्याही शिवसैनिकाला पटले नाही. नेतृत्वापुढे कोणालाही काहीही बोलता येत नव्हते. मागील अडीच वर्षांत मंत्रालयात जिकडे तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. आमदारांना एकमेव शिंदेच भेटत असत. मुख्यमंत्रीही भेटत नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी ही टोकाची भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका म्हणजे समस्त शिवसैनिकांच्या मनातील खदखद आहे.- सुभाष पाटील, पहिले शिवसेना जिल्हाप्रमुख

शिवसेना हळूहळू संपेल का?महापालिकेत १९८८ पासून २००० पर्यंत विविध पदांवर काम केले. हिंदुत्वासाठी जिवाचे रान केले. आज शिवसेनेची ही वाताहत पाहून खूपच वाईट वाटते. एकेकाळी शिवसेना म्हणजे आग होती. आज पक्षाची अवस्था बघा. शरद पवार यांनी जाणीवपूर्वक शिवसेना संपविण्यासाठी महाविकास आघाडी केली. त्याला संजय राऊत यांनी शह दिला. शिवसेनेचा प्रवास असाच सुरू राहिला तर एक दिवस खूप वाईट येईल. २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हा निर्णय चुकला.- अविनाश कुमावत, माजी सभापती, स्थायी समिती

शिवसेना म्हणजे कडवट हिंदुत्वशिवसेना कोणत्या मुद्द्यावर वाढली तर कडवट हिंदुत्व या एकमेव शब्दावर होय. अलीकडे शिवसेनेचा प्रवास बघितला तर तो अत्यंत चुकीचा आहे. एमआयएमच्या आमदारांची मते घेतली. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही सेनेने एमआयएम नगरसेवकांची मते घेतली. बाळासाहेब नेहमी सांगत असत, काहीही झाले तरी काँग्रेससोबत जाणार नाही. शिंदे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. शिवसैनिकांच्या मनातील ही मूळ खदखद बाहेर आली.- राधाकृष्ण गायकवाड, माजी सभागृह नेता

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ