शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

तारातून वीज प्रवाही, पण रेल्वे अजूनही डिझेलवरच; मंजुरी रेल्वे बोर्डाच्या ‘यार्डात’ 

By संतोष हिरेमठ | Updated: September 19, 2023 19:20 IST

जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण, पण विजेवर धावेना रेल्वे

छत्रपती संभाजीनगर : विद्युतीकरणाच्या कामाने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजेवर रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन महिन्यांपूर्वी मनमाड (अंकाई)- छत्रपती संभाजीनगर-जालना या १७४ कि.मी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आणि हा मार्ग इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाला. मात्र, दोन महिन्यांनतरही इलेक्ट्रिक इंजिनची एकप्रकारे वीज ‘गूल’ झालेली असून, रेल्वे बोर्डाच्या ‘यार्डात’ मंजुरी अडकली आहे.

जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण होताच पहिल्यांदा जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस विजेवर धावेल, असे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले. इलेक्ट्रिक इंजिनमुळे रेल्वेच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होते. रेल्वेच्या इंधन खर्चातही बचत होते. दोन महिन्यांनंतरही ही रेल्वे विजेवर धावण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. मराठवाड्याकडे दक्षिण मध्य रेल्वेकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. विद्युतीकरण होऊनही रेल्वे सुरू करण्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे रेल्वे संघटनांतून म्हटले जात आहे.

असे झाले रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण- अंकाई (मनमाड) - छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या १११ कि.मी.चे विद्युतीकरण मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले.- छत्रपती संभाजीनगर - दिनागाव दरम्यानचे ५६ कि.मी.चे विद्युतीकरण मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले.- दिनागाव - जालना दरम्यानचे ७ कि.मी.चे विद्युतीकरण १७ जुलै रोजी पूर्ण.- जालना - परभणी - मुदखेड - धर्माबाद दरम्यानचे २४६ किलोमीटरचे विद्युतीकरण २०२३ अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य.

सर्व तयारी झाली, लवकरच विजेवर रेल्वेसर्व तयारी झालेली आहे. जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच विजेवर रेल्वे धावेल. जनशताब्दी एक्स्प्रेसमध्य रेल्वेकडे धावते. त्यामुळे मध्य रेल्वेशीही समन्वय साधला जात आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजूरी येताच इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावेल.- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), नांदेड विभाग, दमरे

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन