शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबाद छावणीतील गॅस्ट्रोच्या साथीस परिषदेतील कर्मचारीच जबाबदार; सत्यशोधन समितीचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 19:41 IST

नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीच्या अहवालावर आज ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली. यात छावणी परिषदेच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळेच ही साथ पसरल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ठळक मुद्दे नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होतीपरिषदेने या घटने संदर्भात उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती. समितीने छावणी परिषदेच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळेच ही साथ पसरल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला आहे.

औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीच्या अहवालावर आज ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली. यात छावणी परिषदेच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळेच ही साथ पसरल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला आहे.   

छावणी परिषदेतील हजारो नागरिक नोव्हेंबरमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने बाधित झाले होते. यानंतर हे प्रकरण विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही गाजले होते. परिषदेने या घटने संदर्भात उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती. समितीमध्ये नगरसेवक किशोर कच्छवाह , एजीई कर्नल  शर्मा, आनंद शर्मा आणि परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर हे सदस्य होते. सविस्तर चौकशीअंती त्यांनी अध्यक्षांकडे अहवाल सोपविला होता. त्यावर आजच्या बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली.

याशिवाय छावणीतील ५ वार्डातील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय आणि इतर प्रशासकीय निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीस उपाध्यक्ष संजय गारोल, नामित सदस्य एजीई कर्नल शर्मा, तसेच सदस्य प्रशांत तारगे, किशोर कच्छवाह, पद्मश्री जैस्वाल, शेख हनीफ शेख इब्राहीम,मिर्जा रफतुल्ला बेग आणि प्रतिभा काकस उपस्थित होते. सीईओ नायर यांनी कार्यवाहीची नोंद घेतली. त्यांना ओएस वैशाली केनेकर यांनी सहकार्य केले.

या बाबी आहेत अहवालात घटना घडली तेंव्हा परिषदेकडे तांत्रिक कर्मचारी नव्हते. जे कर्मचारी होते, ते प्रशिक्षीत नव्हते. शिवाय कोणत्या कर्मचार्‍याचे काय कर्तव्य अथवा जबाबदारी आहे याबाबत परिषदेने कोणालाही पत्र किंवा मार्गदर्शन केले नसल्याचेही निदर्शनास आले. एखादा कर्मचारी रजेवर जाताना त्याचा कार्यभार दुसर्‍या कर्मचार्‍याला सोपवीत नाहीत. रेल्वे स्थानकाजवळील ‘स्लीव्हज व्हॉल्व’ वेळेवर दुरुस्त केला गेला नव्हता. छावणी परिषदेने महापालिकेला छावणीच्या हद्दीत नदीमध्ये मलनि:स्सारण (ड्रेनेज) वाहिन्या टाकण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. मात्र, त्यांच्या त्या कामावर देखरेख केली नाही. महापालिकेने ड्रेनेजचे घाण पाणी उघड्यावरच सोडलेले होते. तसेच साठवण टाकी (सम्प) आणि जलकुंभाची साफसफाई केली नव्हती, या व इतर बाबी बैठकीतील प्रदिर्घ चर्चेत निदर्शनास आल्या. 

कायदेशीर सल्ला घेणार परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या चुकीमुळेच गॅस्ट्रोने हजारो लोक बाधीत झाल्याचा सकृदर्शनी निष्कर्ष अहवालातून निघाला आहे. मात्र, संबंधीतांवर काय कारवाई करावी, यासंदर्भात कायदेशीर सल्ला आणि योग्य ती प्रक्रिया पुर्ण करुनच येत्या १०-१५ दिवसात ठरविले जाईल, असे अध्यक्ष ब्रिगेडियर पात्रा यांनी बैठकीत जाहीर केल्याचे उपाध्यक्ष संजय गारोल आणि इतर नगरसेवकांनी पत्रकारांना सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यchavaniछावणीAurangabadऔरंगाबाद