शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही ‘समांतर’चा प्रश्न सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:27 IST

समांतर जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापालिका आणि कंपनीने बसून ठोस निर्णय घ्यावा, असे १० आॅक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले खरे; मात्र या प्रश्नावर महापालिकेला अजूनही तोडगा काढता आलेला नाही. कंपनी आणि महापालिका यांच्यात बैठकांवर बैठका सुरू आहेत. आता या प्रकरणात राज्य सरकारनेच हस्तक्षेप करावा, असा सूर महापालिकेने लावला आहे

ठळक मुद्देनिधी दहा वर्षांपासून पडून : मूळ रकमेवर व्याज १२७ कोटी ९ लाख

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापालिका आणि कंपनीने बसून ठोस निर्णय घ्यावा, असे १० आॅक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले खरे; मात्र या प्रश्नावर महापालिकेला अजूनही तोडगा काढता आलेला नाही. कंपनी आणि महापालिका यांच्यात बैठकांवर बैठका सुरू आहेत. आता या प्रकरणात राज्य सरकारनेच हस्तक्षेप करावा, असा सूर महापालिकेने लावला आहे.जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत २ हजार मि. मी. व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात १६१ कोटी २० लाख रुपयांचा निधी दिला. या निधीचा आजपर्यंत महापालिकेला सदुपयोग करता आला नाही. ४०० कोटींची मूळ योजना जाणीवपूर्वक पीपीपी मॉडेलवर नेऊन एक हजार कोटीपर्यंत नेण्यात आली. सोयीनुसार मर्जीतील खाजगी कंपनीकडे पाणीपुरवठा योजना सोपविण्यात आली. कंपनीची नियत आणि इरादे योग्य दिसत नसल्याचे पाहून तत्कालीन आयुक्तांनी चक्क कंपनीची हकालपट्टी केली. या निर्णयाविरोधात कंपनीने थेट सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. मागील दोन वर्षांपासून हा विषय न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात कंपनीने दिलेल्या अर्जानुसार समेट घडवून आणण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी मनपा सर्वसाधारण सभेत ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला कानपिचक्या देत कंपनीसोबत बसून अंतिम निर्णय घ्यावा, औरंगाबादकरांना जर आता पाणी दिले नाही, तर भविष्यात कधीच देऊ शकणार नाही, योजना पूर्ण करण्यासाठी कितीही निधी लागला तरी राज्य शासन शंभर टक्केमदत करील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. समांतरचे काम करणाऱ्या कंपनीसोबत आतापर्यंत चार बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक बैठकीत कंपनीने अशक्यप्राय अशा अटी मनपासमोर ठेवल्या. त्यामुळे बोलणी फिसकटली. आता शेवटचा प्रयत्न म्हणून ५ जानेवारी रोजी कंपनीला चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे.राज्य सरकारने हस्तक्षेप करावासमांतर जलवाहिनी योजनेसाठी मनपाकडे जवळपास पावणेतीनशे कोटी रुपये पडून आहेत. बँकेत पैसे ठेवूनही योजना पूर्ण करू शकत नाही, हे मनपाचे शल्य आहे. या प्रकरणात राज्य शासनाने अंतिम तोडगा काढावा, अशी विनंती गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. रस्त्यांसाठी १५० कोटी, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४० कोटींची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.समांतर योजनेचा आर्थिक लेखाजोखाकेंद्राचा निधी - १४३ कोटी ८६ लाखराज्याचा निधी- १७ कोटी २० लाखएकूण- १६१ कोटी २० लाख...........................................मनपाने खर्च केलेली रक्कम -२१ कोटी १४ लाखशिल्लक रक्कम - १४४ कोटी ६६ लाखयोजनेच्या निधीवर व्याज- १२७ कोटी ९ लाखएकूण- २६७ कोटी २५ लाख

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका